बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक; झीशानला कॅनेडियन पोलिसांनी पकडले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधार झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधार झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केली आहे.
दबावाने किंवा लोभाने धर्मांतर घडवणे ही एक प्रकारची हिंसाच आहे. मात्र, जर एखाद्याने स्वेच्छेने धर्मांतर केले तर त्यास संघाचा विरोध नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
गंगा गोदावरी पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; विश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!! असला प्रकार नाशिक मध्ये घडला.
अजूनही “टाळी”, “पावले” आणि “फोन कॉल” या शब्दांपर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!, अशी शिवसेना मनसे युतीची आजही अवस्था आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी नाशिकमध्ये बोलताना पक्षवाढीसाठी आपल्या पक्षाची कवाडे सर्वांसाठी खुली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजरांसाठी भाजपने अवघ्या 24 तासांतच आपले दरवाजे खुले केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 15 ऑगस्टला लागेल, असा अंदाजही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याच्या तिजोरीवर माझी लाडकी बहीण योजनेचा ताण पडत असल्याच्या बातम्या चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभरातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या योजनांची मागील 3 वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी, सरकारने या योजनाच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज झाले आहे. यामुळे एका अर्थाने मागील वेळी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यामुळे नागपूर ते मुंबई मधील अंतर कमी झाले असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम, ‘दख्खन केदारण्य’ची निर्मिती व श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा (ऑनलाईन) शुभारंभ पार पडला.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन समारंभातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच शक्तिपीठ महामार्ग देखील पूर्ण करू, असा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण झाले.
नाशिक मधल्या वादग्रस्त पुरोहित संघातली 38 वर्षांची मक्तेदारी अखेर संपली. सतत मनमानी कारभार चालविणाऱ्या सतीश शुक्ल यांची पुरोहित संघाने अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.
राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या शक्यतेवर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दोन भावांनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी थेट संवाद साधावा. त्यांच्याकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही”
भारतीय तंत्रज्ञान संस्थांना (IITs) देशातील सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाच्या STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) शिक्षण केंद्रांच्या रूपात पाहिलं जातं. या संस्थांनी शेकडो अभियंते, शास्त्रज्ञ, संशोधक घडवले, जे आज भारताची आणि जगाची प्रगती घडवत आहेत. पण या यशस्वी तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीचा शिरकाव झाला आहे, असे ओपी इंडिया या संकेतस्थळाने उघडकीस आणले आहे.
अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही. मात्र अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली तर त्यांच्या पक्षातील लोकं तुटून पडतात. त्यामुळे अजित पवार एकटे पडले आहेत, असा टाेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवा यांनी अजित पवारांना लगावला आहे.
ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या यांना भाजपच्या वाढत्या ताकदीची भीती वाटते आहे, पण त्याहीपेक्षा दोन्हीकडच्या नेत्यांना एकत्र येण्याची जास्त धास्ती वाटते आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मुंबई येथे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाच्या वृक्षलागवड मोहिमेसंदर्भात बैठक पार पडली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पक्षातून हाकालपट्टी केलेले नाशिक मधले नेते सुधाकर बडगुजर यांची भाजप मधली संभाव्य एन्ट्री म्हणजे आपल्या पुढच्या राजकारणाला धोका आहे
मी शिवजयंती, आंबेडकर जयंतीमध्ये नाचतो. तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले असे विचारले तर काय होईल? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही, असा पलटवार भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
मुंबईत पावसाळ्यापूर्वी म्हाडाने एक मोठे आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. म्हाडाचा एक घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाने (एमबीआरआरबी) शहरातील सीज केलेल्या ९६ इमारतींना “सर्वात धोकादायक” म्हणून घोषित केले आहे.
बकरी ईदनिमित्त गायींची कत्तल होऊ नये यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने रणनीती ठरवली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर प्रमुख अमोल ठाकरे म्हणाले की, बकर ईदच्या ४८ तास आधी महाराष्ट्राच्या सीमेवर बजरंग दल चौक्या उभारेल,
डोंबिवली मधल्या एका पंधरा वर्षाच्या मुलीला ऊस लावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला तिला डांबून ठेवले आणि नंतर वेश्याव्यवसायात ढकलले. या सगळ्या प्रकरणात तब्बल 33 आरोपी असल्याचे पोलिसांना आढळून आले.
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांच्या भेटीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधींची अपाँइटमेंट घेऊन एक तासात त्यांना भेटून दाखवावे, असे एकप्रकारे आव्हानच त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना केले होते.
मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पुण्यात रविवारी शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसल्याने पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आमचे विचार वेगवेगळे असले, तरी कुटुंब म्हणून सोबत असतो. घरातील कार्यक्रमाला आम्ही एकत्र येतोच. ते आज बारामतीत माध्यमांशी बोलत होते.
एखाद्या सोसायटीत जबरदस्ती जर बकरा कापला गेला तर आमचे हिंदुत्ववादी सरकार त्याच्या विरोधात नक्कीच कारवाई करेल. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही. तर हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. इथे शरीया कायदा लागू होत नाही, असा इशारा राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचे काम दुधात साखरे सारखे असते. चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार करण्याचं काम होते. आपले ऐतिहासिक योगदान राहिले आहे, ते यापुढे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.