प्रतिनिधी
मुंबई : महापालिका निवडणूक भाजपा आणि एकनाथ शिंदे गट यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. त्याचवेळी अमित शाह यांनी भाजपला मुंबई महापालिकेत 150 जागा निवडून आणण्याचे टार्गेट दिले आहे. हाय प्रोफाईल गणेश दर्शने झाल्यानंतर अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुंबईवर फक्त भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे, असे निर्देश अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी मुंबई महापालिकेत 150 जागांचे टार्गेट भाजपाला दिले आहे. Amit Shah’s visit: BJP target 150 in Mumbai Municipal Corporation
राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र विश्वासघात धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असले पाहिजे, आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे. शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचही ते म्हणाले. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणत फक्त दोन जागांसाठी शिवसेने युती तोडल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. बीएमसीसाठी भाजप शिंदे गटाचं 150 जागांचे टार्गेट असून, खयाली पुलावामुळे शिवसेनेची सध्याची अवस्था झाल्याचे शाह म्हणाले.
अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अमित शाह म्हणाले, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळे काही चालेल पण धोका सहन करू नका, जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. 2014 मध्ये दोन जागांसाठी शिवसेनेनेच युती तोडली होती, असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. शिवसेनेनेच आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे त्यांनी म्हटले.
Amit Shah’s visit: BJP target 150 in Mumbai Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- शिक्षक दिनानिमित्त युजीसीची सावित्रीबाईंच्या नावाने फेलोशिप; अन्य 4 फेलोशिपही जाहीर!!
- टाटा सोडल्यानंतर सायरस मिस्त्री काय करत होते? : शापूरजी पालोनजींचा असा आहे व्यवसाय विस्तार
- मर्सिडीझच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह : 68 लाखांची कार, 7 एअरबॅग, 1950 सीसी इंजिन… सेफ्टी फीचर्स असूनही सायरस मिस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू
- सायरस मिस्त्रींचा रतन टाटांशी का झाला होता वाद?