• Download App
    मराठा महासंघाच्या बैठकीत मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक, जरांगेंना पाठिंबा; मोदी सरकारकडे मागण्या!! Akhil Bharatiya maratha mahasangh praise manohar joshi, devendra fadnavis and supporters manoj jarange

    मराठा महासंघाच्या बैठकीत मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक, जरांगेंना पाठिंबा; मोदी सरकारकडे मागण्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक झाले. त्याचबरोबर मनोज जरांगे यांना पाठिंबाही दिला, तसेच मराठा महासंघाने मोदी सरकारपुढे काही मागण्याही मांडल्या. Akhil Bharatiya maratha mahasangh praise manohar joshi, devendra fadnavis and supporters manoj jarange

    अखिल भारतीय मराठा महासंघाला पुढच्या वर्षी 125 वर्षे पूर्ण होत असताना आज मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नागपुरात झाली. या बैठकीनंतर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी विविध विषयांची माहिती दिली. त्यामध्ये, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांना पाठिंबा, तर, ब्राह्मण नेत्यांकडूनच मराठा समाजाला भरपूर मिळाले, पण मराठा नेत्यांकडून अपेक्षाभंग झाल्याचे जगताप यांनी सांगितले.

    – मोदी सरकारकडे मागण्या

    आरक्षणाची 50 % ची मर्यादा वाढवा, ही आमची पूर्वीपासूनची मागणी असून पटेल, जाट, कर्मी, वानियार यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. देशातील नऊ राज्यांत आरक्षणाची मागणी आहे. समाज वंचित असून मर्यादा वाढवली तर सर्वांचे प्रश्न सुटतील. मराठा हे मोठे भाऊ, ज्या लहान भावाला चुकीने का होईना, ताटात काही दिले ते परत घेण्याचे आमच्या ध्येय धोरणात नाही. म्हणून आमची मागणी मर्यादा वाढवणे ही आहे. आम्हाला फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिले आहे. म्हणून आम्ही आमची जी काही खारीची ताकद होती ती भाजपच्या मागे लावली, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

    दिल्लीतच प्रश्न सुटेल

    मनोज जरांगे यांना आमचा 100 % आमचा जरांगे पाठिंबा आहे. ते जेव्हा जेव्हा मुंबईला येतात तेव्हा माझ्या कार्यालयात त्यांचा पाहुणचार ठरलेला असतो. 150 – 200 कार्यकर्ते येतात, भेटी होतात. माझे म्हणणे आहे की, 50 % मर्यादा सुटली की सर्वांचे प्रश्न सुटतील. माझे जरांगे भाऊंना, भुजबळांना आणि हाके बसलेत त्यांना देखील म्हणणे आहे की अरे इथे काय रडता?? जो प्रश्न इथे सुटूच शकत नाही. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहात तुम्ही. राज्य शासनाच्या हातात काही नाही. भुजबळ, हाके, जरांगे आणि मी आणि सगळे राजकीय पक्षांचे नेते म्हणजे शिंदे, अजितदादा सगळ्यांनी मिळून पंतप्रधानांना साकडे घाला. फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे. आता अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात एक ठराव पारित करायचा आहे, तो राष्ट्रपतींकडे पाठवायचा आहे, राष्ट्रपतींकडून आला की अध्यादेश काढायचा आहे. मर्यादा पन्नास ऐवजी 75 % वाढवली तर देशातल्या सगळ्या वंचितांना आरक्षण मिळेल. पण काही स्वार्थी राजकारण्यांना तो नको आहे, म्हणून आमच्यात भांडणे लावायला कारण चाललं आहे. पण आम्ही भडकणार नाही, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

    वडेट्टीवारांची हकालपट्टी करा

    काल वडेट्टीवारांनी एवढे अश्रू ढाळले. मात्र, मराठा आरक्षणासाठी गेल्या 5 वर्षांमध्ये 200 जण गेले, त्यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा हरामखोर कोणी ओबीसीवाला अश्रू ढाळत आला नाही. 8 दिवस झाले हाके उपोषणाला बसले आहेत, तर डोळ्यात अत्तर टाकून आला होता की काय??, असा प्रश्न मला त्याला विचारायचा आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला सांगायचे आहे, की याची ताबडतोब हकालपट्टी करा नाही, तर पुढच्या निवडणुकीत समस्त मराठा समाज काँग्रेसच्या विरोधात मतदान करेल, असा इशाराही जगताप यांनी दिला.

    तेव्हा भुजबळ कुठे होते?

    छगन भुजबळांबद्दल द्वेष वाटण्याचे कारण शिवसेनेचा बॅनर होता, त्याखाली 90 % मराठा होते. त्या मराठ्यांच्या विरोधात ते बोलताहेत म्हणून हा राग आहे, वैयक्तिक काही नाही. त्यांना मोठे करण्यासाठी कित्येकांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत. ते फेटा बांधून बेळगावला जायचे की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, पण 300 मराठे अडकून पडले होते तेव्हा भुजबळ कुठे गेले होते??

    मुस्लिम आरक्षण हा गंभीर विषय

    मुस्लिम आरक्षण हा गंभीर विषय आहे. कुणाला मुस्लिम हवेत, कुणाला नकोत, मला त्यात जायचे नाही. पण बाबासाहेबांच्या घटनेत सर्वांना समान हक्क दिला आहे तर त्यांना द्यायला अडचण काय, तो सर्वांना मिळावा. या देशात दोनच शासक जमाती झाल्या. एक मुस्लिम आणि एक मराठा. तिथे तर बापाला कापून राजे झाले. आपल्याकडे तसे नाही, आपल्याकडे संस्कार होते. घटनेप्रमाणे त्यांना जर मिळत असेल तर घटनेतले कायदे मुसलमान समाजाला लागू करा. नसतील मानायचे तर जा कुठेही. (मध्ये त्यांनी शरीयतचा उल्लेख केला) तुला अधिकार देतो पण तुला घटनेप्रमाणे वागावे लागेल.

    मराठा नेत्यांवर हल्लाबोल

    माझा विश्वास आहे. जे सगळे मराठे नेते झाले आहेत, मग शरद पवार, अशोक चव्हाण, विलासराव म्हणा किंवा मागचे गेले, ते सर्व त्यांनी मराठा समाजाला काही दिले नाही. जे दिले ब्राह्मणांनीच दिले. मनोहर जोशींनी महामंडळ दिले. आरक्षण फडणवीसांनी दिले, तो टिकले नाही, पण ब्राहणांनीच दिलं ना…!! 4500 लोकांचे भले झाले. त्या 2 वर्षात IAS , IPS, MPSC मध्ये गेले ना त्या कालावधीत. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, आम्ही त्या संस्करातले आहोत. आता आम्हाला मुंबईत फडणवीस भेटणार आहेत. त्यांनी जर आमचे काम केले तर आम्ही भाजपच्या पाठीशी, नाही तर आम्ही मोकळे!!, असे जगताप म्हणाले.

    Akhil Bharatiya maratha mahasangh praise manohar joshi, devendra fadnavis and supporters manoj jarange

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस