विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारला सत्तेच्या वाट्यातला तुकडा म्हणून शरद पवारांनी परतीचा दोर कापला. ही राजकीय वस्तुस्थिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली. अजित पवारांनी एका राजकीय कारवाईने दोन राष्ट्रवादी एकत्र आणायचा शरद पवारांचा डाव फिस्कटवला. शरद पवारांनी सगळेच दोर कापून टाकावे लागले. भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांच्या वक्तव्याने अजितदादा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागला. Ajit Pawar
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेचे जोर धरला होता. दोन्ही बाजूंनी मनोमीलनासाठी वातावरणनिर्मिती झाली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे दिसत असतानाच शरद पवार यांनी मंगळवारी अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची शक्यता फेटाळून लावली. भाजप आणि भाजपसोबत जाणाऱ्या संधीसाधू लोकांसोबत आपल्याला जायचे नाही, असा स्पष्ट संदेश शरद पवार यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. शरद पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. Ajit Pawar
एकीकडे शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीच्या हातात सोपवला होता. मग शरद पवार यांनी काल अचानक अजित पवार आणि भाजपसोबत जायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका का घेतली?, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील घडामोडींमुळे शरद पवारांनी अजितदादांसोबत हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार आणि आमदार हे भाजपसोबत जावे, या मताचे आहेत. खासदार आणि आमदारांनी तसा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडला. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र करण्याच्या हालचालींना वेग आला होता. परंतु, शरद पवारांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात अचानक युतीच्या चर्चांना ब्रेक लावणारे वक्तव्य केले. त्यामुळे शरद पवार गटाकडून सुरु असलेली मनोमीलनाची तयारीही बंद झाली. यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल उभे करण्यासंदर्भात अजित पवार यांनी सूतोवाच केले होते. त्यादृष्टीने अजितदादा गटाकडून सर्वांशी बोलणी सुरु होती. शरद पवार गटाने या निवडणुकीत सहा जागांची मागणी केली होती. अजित पवार चार जागा सोडायला तयारही झाले होते. ही सर्व बोलणी अंतिम टप्प्यात असताना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी परस्पर आपले निळकंठेश्वर हे पॅनल जाहीर करुन टाकले. त्यामध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा समावेश नव्हता. त्यामुळे शरद पवारांनी तातडीने नवी मोट बांधत युगेंद्र पवारांच्या नेतृत्त्वाखाली बळीराजा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बळीराजा पॅनल उतरवल्यानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील “सिल्व्हर ओक” या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांची एक बैठक झाली. यात अजित पवारांनी परस्पर घोषणा केलेल्या पॅनलबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना अजित पवारांनी परस्पर आपले स्वतंत्र पॅनल जाहीर केले. अजित पवार आतापासूनच शरद पवारांसोबत असणाऱ्या लोकांना अशी वागणूक देत असतील तर भविष्यात ते काय करतील?, याबाबत सिल्व्हर ओकवरील बैठकीत चर्चा झाली. या बैठकीअंती शरद पवार यांनी अजित पवार आणि भाजप यापैकी कोणासोबतच जायचे नाही, असा निर्णय घेतला.
Ajit Pawar rejected a piece of power; Sharad Pawar cut the rope of return
महत्वाच्या बातम्या
- Khameneis : खामेनींच्या ‘या’ संदेशानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली
- Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटना- जीव वाचवण्यासाठी जळत्या वसतिगृहातून विद्यार्थी मारत होते उड्या
- Kamal Haasan : …अखेर कमल हसनचा ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकातही होणार प्रदर्शित!
- Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत अखिलेश यादव यांनी केली मोठी घोषणा!