विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार कृषी ठराव आणण्याची शक्यता आहे. Against the Centre’s agricultural law Resolution in the Legislative Assembly today?
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल ओबीसी आरक्षण मुद्यावरून रणकंदन माजले होते. ओबीसी आरक्षण ठराव मांडून तो बहुमताने मंजूर केला होता. त्यावेळी भाजपने आक्षेप घेऊन ठरवाला विरोध केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते. यानंतर आज केंद्र सरकारच्या कृषी कायद्याना विरोध करणारे ठराव सरकारकडून मांडला जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर करून शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत.
कायदे चांगले असूनही त्याला आकसाने विरोध यापूर्वी अनेकदा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. केवळ दोन दिवसाचे अधिवेशन घेऊन ठरावाद्वारे केंद्र सरकारने केलेले कायदे चुकीचे असल्याचा कांगावा पुन्हा या निमत्ताने केला जाण्याची शक्यता आहे.
Against the Centre’s agricultural law Resolution in the Legislative Assembly today?
महत्त्वाच्या बातम्या
- सभागृहात गोंधळ, तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन प्रकरणात भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन
- Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
- महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक