विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात तीन हजारावर अफगाणी विद्यार्थी शिक्षणासाठी राहत आहेत. अनेकांची शिक्षणे पूर्ण झाली आहेत. अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न मी एकून घेतले असून याबाबत केंद्र सरकारला कळविले जाणार आहे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.Afghani students issus will be Discussed with the Center : Aditya Thakrey
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्याने अफगाणी विद्यार्थ्यांना आपल्या नातलगांची ओढ लागली आहे. अनेकजण व्हिसा या मुद्यावर चिंतेत पडले आहेत. अनेक जण मायदेशी परतण्याच्या मनस्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली व समस्या मांडल्या. त्यानंतर ठाकरे बोलत होते.
- महाराष्ट्रात तीन हजारांवर अफगाणी विद्यार्थी
- तालिबानी राजवट आल्याने विद्यार्थी चिंतेत
- अनेकांना मायदेशी जाण्याची लागली ओढ
- व्हिसा आणि शरणार्थी स्टेटसबाबत काही मागण्या
- अनेकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे
- केंद्र सरकारकडे मागण्या पाठवल्या जातील
- महाराष्ट्रात त्यांना काही त्रास होणार नाही