• Download App
    Prakash Ambedkar ॲड. प्रकाश आंबेडकर‎लाडकी बहीण योजना

    Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर‎ म्हणाले- लाडकी बहीण योजना परावलंबी करते, सरकारचे मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले

    Prakash Ambedkar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या राज्य सरकारकडून‎सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले‎जात अाहे. लाडकी बहीण योजनेच्या ‎‎माध्यमातून ‎‎लोकांना परावलंबी‎‎ केले जात आहे, हे ‎‎गुलामीचे लक्षण‎‎आहे, अशी टीका‎‎ वंचित बहुजन‎ आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर ‎( Prakash Ambedkar ) यांनी केली.‎



    नांदेड दौऱ्यात रविवारी दुपारी ते‎ बोलत होते. ते म्हणाले की, रोजगार,‎नोकऱ्या देण्याऐवजी लाडकी‎ बहीणसह अन्य योजनांमधून लोकांना‎ परावलंबी केले जात आहे. यामुळे‎ लोकांनी याचे उत्तर येणाऱ्या ‎विधानसभा निवडणुकीत द्यावे. दोन्ही ‎राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे पक्ष‎ ओबीसी किंवा मनोज जरांगे यांनी‎ मांडलेल्या प्रश्नांवर बोलत नसल्याने‎ रोष व्यक्त होत आहे. तर सर्वोच्च ‎न्यायालयाने एससी, एसटी संदर्भात‎ दिलेल्या निर्णयामुळे सर्वत्र असंतोष‎ पसरला आहे, असे त्यांनी सांगितले.‎यामुळे आता जरांगे यांच्या‎ कार्यकर्त्यांनी जसे प्रत्येक नेत्यांना‎ तुमचा आम्हाला पाठिंबा आहे की‎ नाही, असा जाब विचारला, तसा जाब‎ विचारण्याची वेळ या समुहावर आली‎ आहे.

    आएसएस व भाजप हिंसेची जी‎ भाषा वापरत आहे, यातून समाजाचे‎ गुन्हेगारीकरण होत असून यामुळेच‎ अत्याचार वाढत आहेत, असा ‎आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.‎तर वंचित आघाडी आगामी‎ विधानसभा जिल्हास्तरावर स्थापन‎ करण्यात आलेल्या ओबीसी‎ निवडणूक समन्वय समिती मार्फत‎ लढवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.‎

    Adv. Prakash Ambedkar said- Ladki Bahin Yojana creates dependency

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्षे; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्ट, पण “विलीनीकरण” हा शब्दच नाही त्यात…!!

    पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी; पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर उत्तरे देताना शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची अडचण!!

    Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा यांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;‘खामोश’ डायलॉग, नाव-आवाज-फोटोच्या गैरवापरावर बंदी