• Download App
    Prakash Ambedkar ॲड. प्रकाश आंबेडकर‎लाडकी बहीण योजना

    Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर‎ म्हणाले- लाडकी बहीण योजना परावलंबी करते, सरकारचे मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले

    Prakash Ambedkar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या राज्य सरकारकडून‎सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले‎जात अाहे. लाडकी बहीण योजनेच्या ‎‎माध्यमातून ‎‎लोकांना परावलंबी‎‎ केले जात आहे, हे ‎‎गुलामीचे लक्षण‎‎आहे, अशी टीका‎‎ वंचित बहुजन‎ आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर ‎( Prakash Ambedkar ) यांनी केली.‎



    नांदेड दौऱ्यात रविवारी दुपारी ते‎ बोलत होते. ते म्हणाले की, रोजगार,‎नोकऱ्या देण्याऐवजी लाडकी‎ बहीणसह अन्य योजनांमधून लोकांना‎ परावलंबी केले जात आहे. यामुळे‎ लोकांनी याचे उत्तर येणाऱ्या ‎विधानसभा निवडणुकीत द्यावे. दोन्ही ‎राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे पक्ष‎ ओबीसी किंवा मनोज जरांगे यांनी‎ मांडलेल्या प्रश्नांवर बोलत नसल्याने‎ रोष व्यक्त होत आहे. तर सर्वोच्च ‎न्यायालयाने एससी, एसटी संदर्भात‎ दिलेल्या निर्णयामुळे सर्वत्र असंतोष‎ पसरला आहे, असे त्यांनी सांगितले.‎यामुळे आता जरांगे यांच्या‎ कार्यकर्त्यांनी जसे प्रत्येक नेत्यांना‎ तुमचा आम्हाला पाठिंबा आहे की‎ नाही, असा जाब विचारला, तसा जाब‎ विचारण्याची वेळ या समुहावर आली‎ आहे.

    आएसएस व भाजप हिंसेची जी‎ भाषा वापरत आहे, यातून समाजाचे‎ गुन्हेगारीकरण होत असून यामुळेच‎ अत्याचार वाढत आहेत, असा ‎आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.‎तर वंचित आघाडी आगामी‎ विधानसभा जिल्हास्तरावर स्थापन‎ करण्यात आलेल्या ओबीसी‎ निवडणूक समन्वय समिती मार्फत‎ लढवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.‎

    Adv. Prakash Ambedkar said- Ladki Bahin Yojana creates dependency

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!

    MHADA : मुंबईत पावसाळ्यापूर्वी ‘म्हाडा’चा मोठा निर्णय!

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!