• Download App
    सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ; मुंबईत खोटी वीजबिले ऑनलाईन पाठवून फसवणाऱ्या दोघांना झारखंडमध्ये अटक A sharp rise in cybercrime; Two arrested in Jharkhand for cheating Mumbai by sending fake electricity bills online

    सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ; मुंबईत खोटी वीजबिले ऑनलाईन पाठवून फसवणाऱ्या दोघांना झारखंडमध्ये अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : सायबर क्राईमच्या बातम्या आपण दर दिवसाला ऐकतो. सध्याच इतर क्राईम्स पेक्षा सायबर क्राईम हा जास्त वाढला आहे. रोज नवनवीन केसेस आपल्याला वाचायला मिळतात. मुंबईमध्ये मध्ये खोटी वीजबिले ऑनलाइन पाठवून लोकांना फसवल्याप्रकरणी झारखंडची राजधानी रांचीतून मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. A sharp rise in cybercrime; Two arrested in Jharkhand for cheating Mumbai by sending fake electricity bills online

    4 मार्चला मुंबईमध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक केली. झारखंड मधील रांची येथील वीरेंद्र अशोक लोहरा आणि उमेश परमेश्वर साव या दोघांना सेवरी पोलिसांनी अटक केली. या दोघांनी ऑनलाइन वीजबिले भरण्यासाठी बनावट लिंक पाठवल्या. ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची धमकी देत, ते ग्राहकांची फसवणूक करत होते. ग्राहकांना फोन करून तुमचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे तुमचे वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. ही कारवाई थांबवण्यासाठी त्वरित बिल भरा, अशी धमकी ते देत होते. त्यानंतर वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवरून sms द्वारे एक बनावट लिंक पाठवून त्यावर त्वरित पैसे भरा असे सांगत होते. अशाप्रकारे या दोघांनी अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आहे.

    पोलिसांनी दोघांना रांची येथून अटक केली असून दोघांनी लोक लोकांकडून नेमके किती पैसे उकळले याचा तपास शिवडी पोलीस करत आहेत. तसेच अशा धमक्यांना घाबरून नागरिकांनी बनावट लिंक वर क्लिक करू नये. अशा लिंकची निश्चितपणे खात्री करून घेऊनच गोष्टी कराव्यात, असे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

    A sharp rise in cybercrime; Two arrested in Jharkhand for cheating Mumbai by sending fake electricity bills online

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ