• Download App
    जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी; शहरात विविध ठिकाणी मृतदेह आढळले|4 died due to cold weather in Jalgaon

    जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी; शहरात विविध ठिकाणी मृतदेह आढळले

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव: जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास जळगावमध्ये थंडी वाढली. त्याचा हा परिणाम होता.4 died due to cold weather in Jalgaon

    तापमानाचा पारा ७.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. मृत चौघेही निराधार आणि बेघर होते. ते रस्त्याकडेला झोपले होते. थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करत होते. विविध ठिकाणी ते मृतावस्थेत आढळले.



    मृत व्यक्ती नेमके कोण? याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली

    यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला आहे.

    4 died due to cold weather in Jalgaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

    स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या पवारांना आता क्रिकेटमध्ये राजकीय व्यक्ती नको!!

    Maharashtra Govt : संस्थांनी दिलेला निधी वापरा, नाही तर परत द्या; राज्य शासनाचा 28 फेब्रुवारपर्यंत अल्टिमेटम