• Download App
    वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी । 20 Year Old Gang Raped In Bandra bandstand Sea Shore, Three Arrested by Bandra Police Mumbai

    वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी

    Bandra bandstand : वांद्रे पश्चिममधील प्रसिद्ध बँडस्टँड परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या घटनेतील पीडित तरुणी व आरोपींची पूर्वीपासून ओळख होती. 20 Year Old Gang Raped In Bandra bandstand Sea Shore, Three Arrested by Bandra Police Mumbai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वांद्रे पश्चिममधील प्रसिद्ध बँडस्टँड परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या घटनेतील पीडित तरुणी व आरोपींची पूर्वीपासून ओळख होती. 11 मे रोजी रात्री दोन बाईकवरून हे चौघेही बँडस्टँडजवळील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पीडिता व आरोपी हे मानखुर्दमधील रहिवासी आहेत. हे सर्वजण 20 ते 23 वर्षे वयोगटातील आहेत.

    यानंतर घरी गेल्यावर पीडितेच्या ओटीपोटात दुखू लागल्याचं तिनं सांगितले. बहिणीने विश्वासात घेऊन विचारल्यावर पीडितेने सामूहिक बलात्काराची माहिती दिली. यानंतर बहिणीच्याच पुढाकाराने पीडितेने वांद्रे पोलिसांत तक्रार दिली.

    वांदे पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेत सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    20 Year Old Gang Raped In Bandra bandstand Sea Shore, Three Arrested by Bandra Police Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर; उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, अतुल सावेंनी केली घोषणा

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! e-KYC पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा शपथविधी लवकर का उरकला? शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सवाल