• Download App
    जगातील सर्वात प्रभावी व्यक्ती इंद्रा नुयी यांनाही भारतीय साडी पेहराव्यामुळे जाता यायचे नाही मिटिंगला? | World's one of the influential lady Indra nooyi also faced ban to office meeting due to saree?

    जगातील सर्वांत प्रभावी CEO इंद्रा नूयी यांनाही अमेरिकेत साडीमुळे जाता येत नव्हते मीटिंगला…

    विशेष प्रतिनिधी

     

    दिल्ली : इंद्रा नुई ह्या एक भारतीय-अमेरिकन आहेत. त्यांनी बिझनेस एक्झिक्युटिव्ह आणि पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा म्हणूनही काम केले होते. त्यानी पेप्सीको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणूनही काम केले होते. जगातील 100 प्रभावी व्यक्तिंमध्ये त्याच्या नावाचा समावेश बऱ्याच वेळा झाला आहे.

    World’s one of the influential lady Indra nooyi also faced ban to office meeting due to saree?

    नुकताच त्यांनी केलेले एक विधान चर्चेचा विषय बनले आहे. अमेरिकेतील बुज एलन हॅमिल्टन ह्या आयटी कंपनीत त्या आधी काम करायच्या. आपल्या विधानात त्या म्हणतात की, ज्यावेळी त्या अमेरिकेतील बुज एलन हॅमिल्टन ह्या आयटी कंपनीत काम करायच्या त्यावेळी त्यांना बऱ्याच क्लायंट मिटिंग साठी सहभागी करून घेतले जायचे नाही. कारण त्यांचा भारतीय पेहरावा साडी. त्या रोज ऑफिस मध्ये साडी नेसून जायच्या. आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांनी हा अनुभव लिहिला आहे.


    साडी नेसल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला? शेफाली वैद्य यांचे ट्विट होतेय व्हायरल


    नुकताच दिल्ली येथील रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला साडी नेसलेली असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता. ह्या सर्व पार्श्वभूमीवर नुरी ह्यांनी केलेले विधान लक्ष वेधक ठरत आहे.

    चेन्नई ते जगातील सर्वात मोठ्या कंपनीच्या सीईओ हा त्यांचा प्रवास जगातील सर्व महिलांसाठी एक प्रेरणादायी प्रवास आहे.

    World’s one of the influential lady Indra nooyi also faced ban to office meeting due to saree?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan Army : पाकिस्तानचा दावा- अफगाणिस्तानमधील 3 ठिकाणांवर हल्ले; टीटीपी कमांडरसह 29 दहशतवादी ठार; एक दिवसापूर्वी कराचीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता

    Major Agreements : आता सेशेल्समध्येही UPI ने पेमेंट होईल; भारतासोबत 19 मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब, 1250 कोटींचे कर्जही मिळणार

    Venezuela : व्हेनेझुएलात पुन्हा 5.6 तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत 1430 मृत्यू, 3300 जखमी; 72 तासांनंतर 68 हजार जण अजूनही बेपत्ता