• Download App
    अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर काय म्हणाली नोबेल विजेती मलाला युसूफझाई, वाचा सविस्तर तिची प्रतिक्रया... । nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil

    अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर काय म्हणाली नोबेल विजेती मलाला युसूफझाई, वाचा सविस्तर तिची प्रतिक्रिया…

     malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil : अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की, अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. मलाला म्हणाली की, महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल तिला खूप काळजी वाटतेय. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाची ही पहिली प्रतिक्रिया आहे. nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil


    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की, अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. मलाला म्हणाली की, महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल तिला खूप काळजी वाटतेय. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाची ही पहिली प्रतिक्रिया आहे.

    मलालने ट्वीट केले की, “अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे, हे पाहून आम्हा सर्वांना खूप धक्का बसला आहे. मला तिथल्या महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची खूप चिंता आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी त्वरित युद्धविरामाचे आवाहन करावे, त्वरित मानवतावादी मदत द्यावी आणि निर्वासित व नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे.”

    मलाला युसूफझाई आधीपासूनच तालिबानच्या निशाण्यावर राहिलेली आहे. त्यामुळेच मलालाला पाकिस्तान सोडावे लागले. खरं तर केवळ मलालाच नाही, जगभरातील अनेक लोकांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानात भारतासह अनेक देशांनी अनेक प्रकल्पांची उभारणी केली होती, आता या त्यांचे भविष्य अंधारात लोटले आहे.

    nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

    Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था