विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा – म्यानमारमध्ये लष्करी बंडानंतर नागरिकांची सुरक्षा अत्यंत धोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिक थायलंड आणि भारताच्या सीमा ओलांडत बेकायदा स्थलांतर करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या म्यानमारबाबतच्या विशेष दूत ख्रिस्टीन बर्गनर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. स्थलांतराची ही केवळ सुरुवात असू शकते असा इशाराही दिला आहे. Myanmar condition worsened
म्यानमारमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यांची आज बंद दाराआड चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक समुदायाने ठोस प्रयत्न करणे आवश्यथक असून आशियातील देशांनी आपला प्रभाव वापरून म्यानमारमध्ये स्थैर्य आणणे आवश्यरक असल्याचे बर्गनर यांनी सदस्यांना सांगितले.
सुरक्षा परिषदेत बोलताना म्यानमारमधील हिंसाचाराचा भारताने निषेध केला. देशातील हिंसाचार थांबावा आणि राजकीय नेत्यांची सुटका करावी, अशी मागणी भारताने केली आहे. म्यानमारमधील परिस्थितीवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला जावा, असे सांगतानाच भारताने म्यानमारमधील राखीन प्रांताच्या विकासासाठी हातभार लावण्याचीही तयारी दर्शविली.
Myanmar condition worsened
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राची अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10,900 कोटी रुपयांची PLI योजना, 2.5 लाख रोजगारनिर्मितीसह भारत बनणार फूड ब्रँड्सचे हब
- पाकची विपरीत बुद्धी, ‘महागाई सहन करू, पण भारताकडून घ्यायचं नाही’; इमरान खान यांनी बदलला आयातीचा निर्णय
- मोदींनी डिवचल्यावर ममतांचे प्रत्युत्तर; तुम्ही मतदानाच्याच दिवशी कसे बंगालमध्ये येता..!! हा तर निवडणूक आचारसंहितेचा भंग
- तृणमूलच्या धमकीनंतर गुरुदेवांच्या ‘विश्व भारती’चे कुलगुरु भीतीच्या दडपणाखाली! कुलपती असलेल्या मोदींकडे सुरक्षेची मागणी
- नंदीग्राममध्ये ८०.७९ टक्के मतदान; ममतांनी मतदान रोखल्याचा सुवेंदू अधिकारींचा दावा; तर भाजपने जंगजंग पछाडले तरी तृणमूळच्या विजयाचा ममतांचा दावा