विशेष प्रतिनिधी
कराची – बलुचिस्तानातील हरनईसह सहा जिल्ह्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यात २२ जण मृत्युमुखी पडले असून ३०० हून अधिक जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टेर स्केलवर ५.९ इतकी नोंदली गेली.Earthquake in Baluchistan kills several peopels
नागरिक गाढ झोपेत असताना अचानक जमीन हादरल्याने घबराट पसरली. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले.झोपेत असलेल्या नागरिकांना अचानक जमीन हलत असल्याचा भास झाला.
त्यामुळे भयभीत होऊन घराबाहेर पळाले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हरनई येथे पंधरा किलोमीटर खोलीवर होता. बलुचिस्तानातील हरनई जिल्ह्याबरोबरच क्वेटा, सिबी, पिशीन, किला सैफुल्लाह, चमन, झियारत, झोओब या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले.
बलुचिस्तानात यापूर्वी २०१३ रोजी अवरान जिल्ह्यात भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. त्यात सुमारे ८२५ नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो नागरिक जखमी झाले होते.
Earthquake in Baluchistan kills several peopels
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुलीही लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी , पुढील सत्रापासून प्रवेश सुरु
- युपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर मिळवलेल्या डॉ. अपला मिश्राने मुलाखतीत ‘ही’ उत्तरे दिली होती
- मेनका गांधी वरुण गांधी यांनी भाजप बाहेरची वाट पकडली??; राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळले
- भाजपची ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून गडकरी, गोयल, फडणवीस, चंद्रकांतदादा, विजया रहाटकर, मुंडे, तावडे