Corona Cases in India Today : कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा भारतात भयंकर उद्रेक झाला आहे. दररोजची मृतांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी पाचव्या आणि सलग चौथ्या दिवशी 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 4,03,738 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच काळात 4092 रुग्णांचा जीव गेला आहे. तथापि, कोरोनातून 3,86,444 जण बरेही झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 401,078 नवीन रुग्ण आढळले होते. Corona Cases in India Today More than 4 lakh patients, 4,092 deaths
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा भारतात भयंकर उद्रेक झाला आहे. दररोजची मृतांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी पाचव्या आणि सलग चौथ्या दिवशी 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 4,03,738 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच काळात 4092 रुग्णांचा जीव गेला आहे. तथापि, कोरोनातून 3,86,444 जण बरेही झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 401,078 नवीन रुग्ण आढळले होते.
8 मेपर्यंत देशभरात 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 कोरोना डोस देण्यात आले आहेत. आदल्या दिवशी 20 लाख 23 हजार 532 लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर 30 कोटी 22 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काल 18.65 लाख कोरोना टेस्ट घेण्यात आल्या, ज्याचा सकारात्मकता दर 22 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
कोरोनाची देशातील सद्य:स्थिती
एकूण कोरोना रुग्ण – 2 कोटी 22 लाख 96 हजार 414
एकूण बरे झालेले – 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुपये
एकूण सक्रिय रुग्ण – 37 लाख 36 हजार 648
एकूण मृत्यू – 2 लाख 42 हजार 362
देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे, तर बरे होण्याचा दर 82 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सक्रिय रुग्ण 17 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण लोकांच्या बाबतीतही भारत दुसर्या क्रमांकावर आहे. यूएसए, ब्राझील, मेक्सिकोनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 50 लाखांच्या पुढे
महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या 14 महिन्यांनी शनिवारी राज्यातील एकूण रुग्णसंख्येने 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात 9 मार्च 2020 रोजी कोरोनाच्या दोन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच राहिला आणि आता 20 मे 2021 रोजी येथे कोरोनाचे 50 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात संक्रमणामुळे 75,000 हून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत.
Corona Cases in India Today More than 4 lakh patients, 4,092 deaths
महत्त्वाच्या बातम्या
- Shivsena Vs Congress : शिवसेना मंत्री अनिल परबांकडून काँग्रेस आमदाराच्या कामात अडथळे, जिशान सिद्दिकींनी ट्वीटरवर व्यक्त केली वेदना
- आदर्श गाव : पद्मश्री पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारचा इथेही आदर्श ; कोरोनामुक्तीचा वसा आणि संकल्पपूर्ती
- Corona Vaccine : ‘कोव्हॅक्स करार’ केल्यामुळेच लसीची निर्यात करावी लागली परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे स्पष्टीकरण
- कोरोनाची भूक वाढली, घेणार दहा लाख लोकांचा बळी , देशात १ ऑगस्टपर्यंतचे चित्र; एका संस्थेचे भाकित
- पंतप्रधानांनी पाळले आश्वासन, पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ