विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – भारतातील दुसऱ्या लाटेने जग देखील हादरले आहे. मृतांचा आणि रुग्णांचा दिवसेंदिवस वाढणारा आकडा पाहता जागतिक संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यासाठी जगभरातून मदत केली जात असली तरी पुरेशी नसल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. UNICEF gave alert to world due to corona wave in India
भारतात कोरोनाने थैमान घातले असून ही स्थिती जगासाठी धोक्याची घंटी आहे. संपूर्ण जग जोपर्यंत भारताच्या मदतीसाठी धावणार नाही, तोपर्यंत भारतातील कोरोनाचा कहर दिसत राहील, असेही युनिसेफचे म्हणणे आहे.
यूनिसफेकडून आतापर्यंत भारताला २० लाख फेसशिल्ड आणि दोन लाख मास्कसह महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणाचा पुरवठा केला आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून दररोज तीन ते चार लाख रुग्ण आणि तीन हजाराहून अधिक मृत्यूची नोंद होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०.६ दशलक्ष असून २,२६००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण आशियायी क्षेत्रातील अन्य देशातही रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु एकूण रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास भारताचे प्रमाण ९० टक्के आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
UNICEF gave alert to world due to corona wave in India
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात कडक लॉकडाऊनची घोषणा , 10 ते 24 मे पर्यंत लागू ; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस सकाळी चार तास परवानगी
- पुणे जिल्ह्यातील 27 गावांमध्ये टँकरने पाणी, नळाने पुरवठा केव्हा ? महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरणार केव्हा ?
- दिल्लीकरांसाठी ‘मिल्क ट्रेन’ धावली ; नागपूरहून 40 हजार लिटर रवाना
- शहामृगासारखे संकट आल्यावर वाळूत तोंड खूपसून बसलात, उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना फटकारले
- मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे? लहानग्यांच्या लसीकरणावर विचार करा