• Download App
    पाकिस्तानच्या दबावामुळे तालिबान्यांनी विमानतळाबाहेर भारतीयांना रोखले कागदपत्रांवरून घेतली झडाझडती|Taliban takes on Indians on airport

    पाकिस्तानच्या दबावामुळे तालिबान्यांनी विमानतळाबाहेर भारतीयांना रोखले कागदपत्रांवरून घेतली झडाझडती

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून युद्धपातळीवर प्रयत्न केला जात असताना तालिबानी मात्र त्यात वारंवार अडथळे आणत आहेत. काल दिडशे भारतीय नागरिकांना तालिबान्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.Taliban takes on Indians on airport

    काबूल विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या या भारतीय नागरिकांना दस्तावेजांच्या कारणावरून तालिबान्यांनी ताब्यात घेतले होते. या आडकाठी मागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.



    तालिबान्यांनी ज्या नागरिकांना विमानतळाबाहेर रोखले त्यात ७० हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश होता. अफगाणी नागरिक असल्याचे सांगत त्यांना विमानतळावर जाण्यास मज्जाव करण्यात आला.
    भारताने याआधी दोनशे लोकांची सुटका केली असून त्यात राजदूत आणि अन्य राजनैतिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

    पहिल्या टप्प्यात चाळीसजणांना मायदेशी आणण्यात आले होते त्यात प्रामुख्याने राजनैतिक कर्मचाऱ्यांचाच समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात ‘सी-१७ ’या विमानाच्या माध्यमातून दीडशे भारतीयांना मायदेशी आणण्यात आले होते. आणखी काही नागरिक अफगाणिस्तानातच अडकल्याचे बोलले जाते.

    Taliban takes on Indians on airport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार