• Download App
    Pakistan पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले,

    Pakistan : पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले, हवाई क्षेत्र केले बंद!

    Pakistan

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानातील संबंध टोकाचे ताणले गेले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : Pakistan पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर अनेक मोठे निर्बंध लादले आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधून त्याची प्रतिक्रिया दिसून आली आहे. पाकिस्तानने भारतासोबतचा सर्व प्रकारचा व्यापार संपवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या एनएससीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.Pakistan

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकार काही मोठी कारवाई करण्याची तयारी करत आहे. सततच्या बैठका आणि भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला आहे. सीसीएस बैठकीत भारताने आधीच अटारी चेकपोस्ट बंद करण्यास आणि पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगितले आहे.



    आता निराश होऊन पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे. याचा अर्थ असा की आता कोणतीही भारतीय विमान कंपनी पाकिस्तानच्या हवाई हद्दी वापर करू शकणार नाही आणि पाकिस्तानने वाघा सीमा बंद करण्याची घोषणाही केली आहे. भारतासोबत व्यापर बंदी, भारतीय राजदूतांना ३० एप्रिल पर्यंत भारतात परतण्याचे आदेश आणि पाकिस्तानात असणाऱ्या भारतीयांना चार दिवसांत देश सोडण्यास सांगितले आहे.

    Pakistan cuts trade ties with India closes airspace

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Putin : अमेरिकेपासून रशियापर्यंत सर्व देश भारताच्या पाठीशी; पुतिन म्हणाले- आरोपींना सोडले जाणार नाही, ट्रम्प म्हणाले- आम्ही भारतासोबत

    Turkey : तुर्कीच्या इस्तांबूलमध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; मरमारा समुद्रात केंद्रबिंदू, 1 तासात बसले 3 मोठे धक्के

    Pope Francis : पोप फ्रान्सिस यांच्यावर 26 एप्रिलला अंत्यसंस्कार; पोप यांच्या मृत्यूनंतरचा पहिला फोटो समोर