विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्या त्या संबंधांमध्ये नेमका काय बदल झाला हे दोन्ही देशांमध्ये नियमित राजदूत नेमण्याच्या निर्णयावरून पुढे आले पण त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची बाब बदलली. पण ती काहीशी दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे भारतात हिंसाचार घडविण्यासाठी खलिस्तान्यांनी कॅनडाची भूमी वापरली अशी कबुली कॅनडियन गुप्तहेर संघटनेने आपल्या अहवालात प्रथमच दिली. कॅनडियन गुप्तहेर संघटनेने “खलिस्तानी” हा शब्द त्यात प्रथमच वापरला.
वास्तविक आत्तापर्यंत कॅनडाच्या कुठल्याच सरकारने खलिस्तानी हा शब्द फुटीरतावादी या अर्थाने वापरला नव्हता. कॅनडाच्या सरकारने खलिस्तानचे स्वातंत्र्य युद्ध भारतात सुरू आहे. भारताच्या सरकारशी आणि राज्य व्यवस्थेची खलिस्तानी स्वतंत्र देशासाठी लढत आहेत अशी भूमिका जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारने घेतली होती. त्यामुळे खलिस्तानी मनोवृत्तीचे लोक कॅनडात भारताविरुद्ध वाटेल तशी गरळ ओकत होते.
पण आता कॅनडातल्या गुप्तहेर संघटनेने खलिस्तानी दहशतवाद्यांचे काळे कारनामे आपल्या अहवालात नमूद केले. 1980 पासून खलिस्तानी लोकांनी कॅनडामध्ये बस्तान बसवले. अनेकांनी सुरुवातीला खलिस्तानच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलने केली त्यामुळे त्याचे भयानक रूप त्यावेळी समोर आले नाही. पण त्यांच्यातल्याच एका गटाने हिंसक मार्गांचा अवलंब केला. त्यासाठी कॅनडाची भूमी वापरली. त्यांनी अनेक युवकांचे घातक मतपरिवर्तन केले. त्यांना हिंसाचारासाठी चिथावणी दिली. कॅनडाची गुप्तहेर संघटना CSIS खलिस्तानी दहशतवाद्यांच्या या घातक कारवायांवर नजर ठेवून आहे, असे अहवालात नमूद केले आहे. कॅनडा सरकारच्या बदलत्या धोरणाचा हा अहवाल मोठा निदर्शक ठरला आहे. इथून पुढे कॅनडातल्या खलिस्तानी फुटीरतावाद्यांवर तिथले सरकार कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
Khalistani ‘extremists’ use Canada for violence in India says, Canadian Intel
महत्वाच्या बातम्या
- Khameneis : खामेनींच्या ‘या’ संदेशानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली
- Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटना- जीव वाचवण्यासाठी जळत्या वसतिगृहातून विद्यार्थी मारत होते उड्या
- Kamal Haasan : …अखेर कमल हसनचा ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकातही होणार प्रदर्शित!
- Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत अखिलेश यादव यांनी केली मोठी घोषणा!