वृत्तसंस्था
जीनिव्हा : भारताने पुन्हा एकदा UNSC मध्ये बदलाची मागणी केली आहे. UN मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या- सुरक्षा परिषदेत सुधारणांवर चर्चा 1990च्या दशकात सुरू झाली. जगाची आणि आपल्या भावी पिढ्यांना अजून किती वाट पाहावी लागणार आहे? आम्ही यापुढे प्रतीक्षा करू शकत नाही.India spoke harsh words in UNSC; After 25 years, how long will we wait for reforms
रुचिरा पुढे म्हणाल्या– 2000 मध्ये पहिल्यांदाच मिलेनियल समिटमध्ये जागतिक नेत्यांनी UNSC मध्ये सुधारणा करण्याचा संकल्प केला होता. या घटनेला जवळपास 25 वर्षे उलटून गेली आहेत. आताही बदल केले नाहीत तर UNSC ही विस्मृतीच्या दिशेने वाटचाल करणारी संस्था बनेल.
रुचिरा कंबोज यांनी सुचवले की पुढील वर्षी UNचा 80 वा वर्धापन दिन आहे आणि सप्टेंबरमध्ये एक महत्त्वपूर्ण शिखर परिषद होणार आहे. अशा वेळी या आवश्यक सुधारणा केल्या पाहिजेत. भारतीय प्रतिनिधी म्हणाले- आफ्रिकेसह तरुण आणि भावी पिढ्यांच्या आवाजाकडे लक्ष देऊन आपल्याला सुधारण्याची गरज आहे.
रुचिरा पुढे म्हणाल्या- यूएनएससीमध्ये बदलाच्या नावाखाली केवळ कायम नसलेले सदस्य वाढवल्याने संस्थेतील असमानता वाढू शकते. परिषदेची वैधता सुधारण्यासाठी, तिच्या रचनेत सर्व सदस्यांचा समान सहभाग आवश्यक आहे. व्हेटो पॉवर यूएनएससीच्या सुधारणांमध्ये अडथळा म्हणून काम करू नये यावरही त्यांनी भर दिला.
भारताच्या या सूचनांना UNSC स्थायी सदस्य ब्रिटनने पाठिंबा दिला होता. याशिवाय ब्राझील, जपान आणि जर्मनी यांसारख्या G4 भागीदार देशांनीही 193 सदस्य देशांच्या विचारांच्या महत्त्वावर जोर देऊन, अ-स्थायी श्रेणीमध्ये अधिक प्रतिनिधित्वासाठी भारताच्या विधानाचे समर्थन केले.
India spoke harsh words in UNSC; After 25 years, how long will we wait for reforms
महत्वाच्या बातम्या
- बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात पवारांनी दिली वय वाढल्याची कबुली, पण…!!
- जरांगेंच्या आंदोलनामुळे जेवढी मराठा मतांमध्ये एकजूट, तेवढीच मराठा + इतरांच्या मतांमध्ये फाटाफूट; वाचा आकडेवारी!!
- जम्मू काश्मीर : पुंछमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, 7 आयईडी आणि वायरलेस सेट जप्त
- सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!!