विशेष प्रतिनिधी
अंकारा : तुर्कस्तानमध्ये एकीकडे जंगलांमध्ये वणव्यांमुळे होरपळ होत असताना उत्तर भागात पावसानेही थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे येथे अनेक ठिकाणी पूर आले असून यामध्ये आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. Fire and flood same time in Turki
कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनामुळे पर्यावरण बदलाचा वेग वाढला असून त्यामुळेच अवकाळी आणि अतिरिक्त पाऊस, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, वणवे, पूर, वादळे यांचे प्रमाण वाढले आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञां नी व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या घटना जगात इतर ठिकाणीही अधिक प्रमाणात घडू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वेगाने वहात असल्याने दोन दिवसांत पाच पूल कोसळले आहेत. १९ हेलिकॉप्टर, २४ बोटी आणि साडे चार हजार जवान बचाव कार्य करत असले तरी अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली असून काही गावांमध्ये वीजही नसल्याने अनेक अडथळे येत आहेत.
उत्तरेत पुराने तडाखा दिला असताना दक्षिणेकडे मुल्गा प्रांतात वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. २८ जुलैपासून या भागात दोनशेहून अधिक ठिकाणी वणवे पेटलेले आहेत. आगीमुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून हजारो जणांना विस्थापित व्हावे लागले आहे.
Fire and flood same time in Turki
महत्त्वाच्या बातम्या
- President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख
- World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण
- सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही
- वीर जवान तुझे सलाम : कॅप्टन आशुतोष आणि मेजर अरुण कुमार पांडे यांना शौर्य चक्र, काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांचा केला होता खात्मा