मध्य प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई ; आतापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Naxalites मध्य प्रदेशातील बालाघाट येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या आशासह चार नक्षलवाद्यांना ठार मारले. नक्षल निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे.Naxalites
बुधवारी, गढी पोलिस ठाण्याच्या सूपखार वनक्षेत्रातील रौंडा फॉरेस्ट कॅम्पमध्ये हॉकफोर्सची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. ज्यामध्ये १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी कमांडर आशासह चार महिला नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. चारही महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
चकमकीत मारल्या गेलेल्या चार महिला नक्षलवादी कान्हा भोरमदेव समितीच्या सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी प्रमिला आणि करिश्मा अशी दोन नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. तर चौथी महिला नक्षलवादीची अद्याप ओळख पटलेली नाही. मारल्या गेलेल्या महिला नक्षलवाद्यांच्या मृतदेहांजवळून एक इन्सास रायफल, एक एसएलआर आणि एक ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे. याशिवाय चकमकीच्या ठिकाणाहून दैनंदिन वापराच्या वस्तू आणि नक्षलवादी साहित्यही जप्त करण्यात आले.
या चकमकीत चार महिला नक्षलवाद्यांना ठार करणाऱ्या पोलिसांचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री यादव म्हणाले की, २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करायचे आहे.
female Naxalites including Asha who had a reward of Rs 14 lakhs were eliminated
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावरील सुनावणी लांबली; सुप्रीम कोर्टाने दिला होळीनंतरचा वेळ
- Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा
- Hamas : गाझा युद्धबंदी कराराच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी करण्यास तयार – हमास
- Rekha Gupta भाजपने रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्लीला दिला चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ!!