विशेष प्रतिनिधी
बिजींग : भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग हा चीनचा असल्याचे दाखविण्याचा कट चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला आहे. जागतिक पातळीवरील नकाशात हे दोन्ही प्रदेश चीनचे असल्याचे दर्शविणारे नकाशे जप्त करण्यात आले आहे.China’s rudeness to show Arunachal Pradesh and Aksai Chin
चीनच्या सीमाशुल्क विभागाने नकाशांचे बॉक्स जप्त केले आहेत. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हे चीनचे भाग असल्याचे दाखविले आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्याचबरोबर अक्साई चीनही आपला भाग दाखविला आहे.
शाघांय विमानतळावर एक बॉक्स जप्त करण्यात आले. त्यामध्ये बेडशिट म्हणून पाठविण्यात येत असलेली ३०० पॅकेट जप्त करण्यात आली. त्यामध्ये बेडशिटच्या नावाखाली नकाशे होते. या नकाशांवर अरुणाचल आणि अक्साई चिनला भारताचा नव्हे तर चीनचा भाग दाखविला होता.
नकाशे कोठे निर्यात करायचे आहेत याचा उल्लेख केला नाही. चीनने मानभावीपणा दाखवित हे नकाशे नष्ट करण्याचे ठरविले आहे. हे नकाशे बनविणाºया कंपनीला दंडही आकारण्यात येणार आहे.
भारतीय प्रदेश आपला म्हणून दाखविण्याचा चीनचा हा पहिलाच प्रयत्न नाही. मार्च, 2019 मध्ये अरुणाचल प्रदेश हा भारतात नव्हे तर स्वतंत्र देश म्हणून दाखविला होता. त्यावेळीही ३० हजार नकाशे नष्ट करण्यात आले होते.
चुकीच्या नकाशांसह एकूण 803 बॉक्स जप्त आणि नष्ट करण्यात आले. नकाशे एका गुप्त ठिकाणी नेले गेले आणि ते नष्ट केले गेले आहेत, असे चीनने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात, चीनच्या खेळाडूंच्या आगमनादरम्यान प्रदर्शित झालेल्या नकाशामध्ये तैवान किंवा दक्षिण चीन समुद्राचा समावेश नसल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसारणावर चीनने एनबीसी युनिव्हर्सल चॅनेलवर टीका केली.
China’s rudeness to show Arunachal Pradesh and Aksai Chin
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्सुक
- प्रतिमा मलिन केली जात असल्याचा शिल्पा शेट्टीचा आरोप, माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव
- जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा
- आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट