Bronze statue of Mahatma Gandhi vandalised in Australia : भारत सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या मोठ्या कांस्य पुतळ्याची ऑस्ट्रेलियात तोडफोड करण्यात आली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत यास लाजिरवाणे म्हटले आहे. या घटनेबद्दल भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायात संताप आहे. Bronze statue of Mahatma Gandhi vandalised in Australia Which Was gifted by Indian government
वृत्तसंस्था
सिडनी : भारत सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या मोठ्या कांस्य पुतळ्याची ऑस्ट्रेलियात तोडफोड करण्यात आली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत यास लाजिरवाणे म्हटले आहे. या घटनेबद्दल भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायात संताप आहे.
‘द एज’ या वृत्तपत्रानुसार, पंतप्रधान मॉरिसन यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे महावाणिज्यदूत, राजकुमार आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांसमवेत रावविले येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये पुतळ्याचे अनावरण केले आणि काही तासांनंतर ही घटना घडली.
‘सांस्कृतिक स्मारकांवर हल्ला खपवून घेतला जाणार नाही’
वृत्तानुसार मॉरिसन यांनी म्हटले होते की, “अनादराची ही पातळी पाहणे लज्जास्पद आणि अत्यंत निराशाजनक आहे.” ते म्हणाले की या देशातील सांस्कृतिक स्मारकांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत. ते म्हणाले, ‘जो कोणी याला जबाबदार आहे त्याने ऑस्ट्रेलियन भारतीय समुदायाचा अपमान केला आहे आणि लाज वाटली पाहिजे.’ हा पुतळा भारत सरकारकडून भेट देण्यात आला होता.
व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 5:30 ते शनिवारी संध्याकाळी 5:30 दरम्यान अज्ञातांनी पुतळा तोडण्यासाठी पॉवर टूल्सचा वापर केला, एबीसी न्यूजने हे वृत्त दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, नॉक्स क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि साक्षीदारांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन करत आहेत. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना शहरातील भारतीय समुदायाने याला “खालच्या पातळीचे कृत्य” म्हटले आहे.
Bronze statue of Mahatma Gandhi vandalised in Australia Which Was gifted by Indian government
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!