• Download App
    रक्तपात व काबूल बेचिराख होण्यापासून थांबवण्यासाठी देश सोडला, अश्रफ घनी यांचा दावा|Ashraf Ghani wrote post on social media

    रक्तपात व काबूल बेचिराख होण्यापासून थांबवण्यासाठी देश सोडला, अश्रफ घनी यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानात रक्ताचे पाट वाहण्यापेक्षा मी निघून जाणेच योग्य होते. आता नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी तालिबानवर आहे, असे अफगणिस्तानचे अश्रफ घनी यांनी म्हटले आहे.
    सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात अश्रफ घनी यांनी म्हटले, की एका पर्यायाची निवड करणे माझ्यासाठी कठीण काम होते.Ashraf Ghani wrote post on social media

    एक तर तालिबानचा सामना करणे किंवा देश सोडून देणे. जर तालिबानशी मुकाबला केला असता तर अनेक नागरिक हुतात्मा झाले असते आणि काबूल डोळ्यादेखत बेचिराख झाले असते. ६० लाख लोकसंख्येच्या शहरात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असती. मला सत्तेवरून हटविण्याचे तालिबानने ठरवले आहे.



    त्यामुळे ते कोणत्याही स्थितीत काबूलवर हल्ला करणार होते. म्हणून रक्तपात थांबवण्यासाठी मी देशातून निघून गेलेले बरे. तालिबानने बंदुकीच्या जोरावर युद्ध जिंकले आहे.परंतु लोकांची संपत्ती, आत्मसन्मानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आता तालिबानची आहे.

    Ashraf Ghani wrote post on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    US Orders : अमेरिकन नागरिकांना तातडीने इराण सोडण्याची सूचना; दूतावासाने म्हटले- मदतीची वाट पाहू नका, स्वतः बाहेर पडा

    Shehbaz Sharif : पाक पंतप्रधानाची दर्पोक्ती- काश्मीर पाकिस्तानचा भाग बनेल, काश्मिरींसोबत खंबीरपणे उभे, हा प्रदेश पाकची जीवनवाहिनी

    Shocking Epstein Files : एपस्टीनच्या नव्या फाइल्समध्ये दावा-मुलींना जबरदस्तीने प्रेग्नंट केले; लैंगिक संबंधांदरम्यान महिलांचा गळा दाबला; मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरले