• Download App
    स्फोटक अफगणिस्तानमधून ४०० भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका, भारताच्या भूमीत आल्याचा आनंद 400 indin came from Afghanistan to india

    स्फोटक अफगणिस्तानमधून ४०० भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका, भारताच्या भूमीत आल्याचा आनंद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – अफगाणिस्तानमधील भारतीय नागरिकांसह आश्रय मागतील त्यांना परत सुखरूप आणण्याची ग्वाही मोदी सरकारने दिली आहे. त्यानुसार पहिल्या विमानाद्वारे १६८ जणांना भारताच्या भूमीत आणण्यात आले. यात १०७  भारतीय, २३ अफगाणी शीख आणि हिंदू यांचा समावेश होता. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंग खालसा यांनाही भारतात आणण्यात आले आहे.  400 indin came from Afghanistan to india

    एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाद्वारे ८७ भारतीय आणि दोन नेपाळी नागरिकांना दुशांबेहून आणण्यात आले. या सर्वांना काबूलहून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



    आणखी एका विमानाद्वारे १३५ नागरिकांना भारतात आणण्यात आले. त्यांना गेल्या दोन-तीन दिवसांत काबूलहून कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि ‘नाटो’च्या विमानांद्वारे नेण्यात आले होते. तेथून आता त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले.

    भारताने आश्रय दिल्याबद्दल सर्व अफगाण नागरिकांनी भारताचे आभार मानले आहेत. एक अफगाण महिला भारताला धन्यवाद देताना म्हणाली, ‘‘तालिबानी लोकांनी आमची घरे उद्ध्वणस्त केली, तिथे आमच्या मदतीसाठी भारतीय बांधव पुढे आले, ही मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही.’’

    400 indin came from Afghanistan to india

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Suicide : नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांचा आत्महत्येचा प्रयत्न; एपस्टीन फाईलमध्ये नाव आले होते; भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा शक्य

    US Claims China : अमेरिकेचा दावा- चीनने 2020 मध्ये गुप्तपणे अणुचाचणी केली; ताकद वाढवतोय, 6 वर्षांत 400 शस्त्रे बनवली

    US Nuclear : अमेरिकेच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजावर शौचालयांची समस्या; डिझाइनमधील दोषामुळे शौचालये जाम