Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवादास जबरदस्त दणका!, नारायणपूर चकमकीत २६ नक्षलींचा खात्मा
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी सकाळी ११ वाजेपर्यंत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जखमी झाला. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही चकमक बुधवारी सकाळी सुरू झाली.