Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बांगलादेशला दिला अल्टिमेटम
शेख हसीना देश सोडून गेल्यापासून आणि मुहम्मद युनूस सत्तेत आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल भारताकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्याचवेळी, बांगलादेशचे अंतरिम सरकार भारताशी संबंध आणखी बिघडवण्यात कोणतीही कसर सोडताना दिसत नाही.