Uttar Pradesh : वादळामुळे उत्तर प्रदेशात प्रचंड नुकसान ; २० जणांचा मृत्यू, १०० घरांना आग
उत्तर प्रदेशात बुधवारी संध्याकाळी अचानक हवामान बदलले. त्यानंतर, राज्यातील अनेक भागात वादळ आणि मुसळधार पाऊस पडला. या वादळामुळे उत्तर प्रदेशात प्रचंड हाहाकार माजला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वादळ आणि हवामानाशी संबंधित घटनांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे १०० घरांना आग लागली. या काळात काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. पण जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.