• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Sonia-Rahul : नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया-राहुल यांना नोटीस बजावण्यास न्यायालयाचा नकार; ईडीला सांगितले- आरोपपत्रातून काही कागदपत्रे गहाळ

    नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यास दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला. आरोपींची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही नोटीस बजावू शकत नाही, असे न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.

    Read more

    Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिप्पणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले; बेजबाबदार विधाने योग्य नाहीत

    स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले. शुक्रवारी न्यायालयाने म्हटले की, आम्ही कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध बाष्कळ बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि आपण त्यांच्याशी कसे वागतो आहोत?

    Read more

    Pahalgam attack : पहलगाम हल्ला- मेलोनींची मोदींशी चर्चा; दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाठिंबा व्यक्त केला

    इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.

    Read more

    आतापर्यंत काश्मिरातून 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले, फडणवीस सरकारकडून विशेष विमानांची व्यवस्था

    पहलगाम येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

    Read more

    पहलगाम मध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या; तरीही लिबरल पुरोगाम्यांकडून काश्मिरियत आणि मुस्लिमांच्या मदतकार्याची जास्त चर्चा!!

    पहलगाममध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी 28 भारतीयांची हत्या केली. त्यात त्यांनी धर्म विचारून 27 हिंदूंना गोळ्या घातल्या.

    Read more

    Amit Shah ‘पाकिस्तानी नागरिकांना ओळखा अन् त्यांना परत पाठवा’

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्यास सांगितले आहे.

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर: कठुआमध्ये ४ संशयित आढळले, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर सतर्क आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. येथे हिरानगर सेक्टरमध्ये एका स्थानिक महिलेने चार संशयितांना पाहिले. महिलेने ताबडतोब सुरक्षा दलांना याची माहिती दिली, त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे, त्यानंतर लष्कराने काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.

    Read more

    Raja Iqbal Singh भाजपचे राजा इक्बाल सिंग झाले दिल्लीचे नवे महापौर

    भारतीय जनता पक्ष दोन वर्षांनी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या महापौरपदावर परतला आहे. भाजपचे राजा इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर बनले आहेत.

    Read more

    Kashmir : काश्मीरमधील हल्ल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रातील 500 पर्यटक राज्यात दाखल

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतले आहेत

    Read more

    Mohan Bhagwat : ‘ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मोहन भागवत यांचे विधान!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर म्हटले आहे की, ही कोणत्याही पंथाची किंवा समुदायाची लढाई नाही. सध्या सुरू असलेला संघर्ष हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. मुंबईत पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी हे सांगितले.

    Read more

    Medha Patkar : मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

    दिल्ली पोलिसांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाईल.

    Read more

    Rahul Gandhi : वीर सावरकरांवरील विधान बेजबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले!

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार भाष्य स्वीकारले जाणार नाही.

    Read more

    Puneet Jaggi : अंमलबजावणी संचालनालयाचे जेनसोल परिसरात छापे; को-फाउंडर पुनीत जग्गी यांना अटक

    सेबीच्या कारवाईनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२४ एप्रिल) जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या जागेवर छापा टाकला. दरम्यान, सह-प्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा प्रवर्तक अनमोल जग्गी दुबईमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    Sharad Pawar पवारांच्या तोंडावर गनबोटे कुटुंबाने सांगितले, टिकल्या काढल्या, अल्ला हूॅं अकबर म्हटले, तरी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या!!, तरीही पवारांना टोचली धर्माची चर्चा!!

    पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड घडविले. 29 हिंदूंना मारले. तिथले भयानक अनुभव सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले.

    Read more

    World Bank : जागतिक बँकेच्या सहाय्याने नवे जलसंपत्ती प्रकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) प्रशासकीय परिषदे’ची दुसरी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    Rahul Gandhi राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची जबरदस्त चपराक; स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन नाही करणार!!

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त चपराक हाणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोणत्याही स्थितीत अपमान सहन करणार नाही.

    Read more

    Lashkar-e-Taiba : लश्कर ए तोएबाचा प्रमुख हाफिज ISIच्या सुरक्षित स्थळी लपला; पाक लष्करप्रमुखाला भारताच्या सर्जिकल स्ट्राइकची भीती

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद अबोटाबादच्या लष्करी छावणीतील गुप्तचर संस्था आयएसआयच्या छावणीत जाऊन लपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लष्करच्या मदरशात लपून बसलेल्या हाफिजला ‘हल्ल्याची’ भीती वाटत होती. त्यामुळे २७ एप्रिल रोजी मुरीदकेच्या मदरशात होणारा कार्यक्रमही रद्द केला आहे.

    Read more

    Naxals : नक्षल्यांचे कंबरडे मोडले, सर्वात मोठी कारवाई; 114 दिवसांत 161 नक्षली ठार, 600 जणांचे आत्मसमर्पण

    गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंद देश नक्षलमुक्त होईल, असे जाहीर केले होते. या मोहिमेअंतर्गत यंदा आतापर्यंत ११४ दिवसांत १६१ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. सुमारे ६०० जणांनी शरणागती पत्करली आहे. २०२४ मध्ये संपूर्ण वर्षात २९६ व २०२३ मध्ये ५६ जण मारले गेले होते. म्हणजे दोन वर्षांतच नक्षलीविरुद्ध घातक कारवाईत ५२८ टक्क्यांची वाढ झाली आहे

    Read more

    Kapil Sibal म्हणे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा; मोदी सरकारच्या आक्रमक धोरणाला फाटे फोडण्यासाठी कपिल सिब्बल यांची सूचना!!

    पहलगाम मध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड केल्यानंतर पाकिस्तानला अनुकूल ठरणाऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांनी “दहशतवादाला धर्म नसतो

    Read more

    Sadhvi Pragya Singh Thakur : मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची NIAची मागणी, 8 मे रोजी सुनावणी

    मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने भाजपच्या भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची एनआयएने मागणी केली आहे. सर्व आरोपींना बेकायदेशीर कृत्य (यूपीए)च्या कलम १६ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा युक्तिवाद मुंबईच्या विशेष न्यायालयात एनआयएच्या वतीने केला आहे.

    Read more

    Pakistani airspace : पाकिस्तानी एअरस्पेस बंद, अमेरिका अन् युरोपच्या उड्डाणांवर परिणाम शक्य; अटारी सीमेवर आता जवानांचे हस्तांदोलन नाही

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पाऊल उचलले आहे. यात सर्वात मोठे पाऊल अटारी-वाघा सीमा तात्पुरती बंद केली आहे. ही सीमा दोन्ही देशांत रोज सायंकाळी होणाऱ्या रिट्रीट समारंभ आणि मर्यादित व्यापारासाठी महत्त्वाची मानली जाते. सरकारकडून सांगितले की, जोवर स्थिती सामान्य होत नाही, तोवर अटारी सीमेवर भारतीय गेट उघडले जाणार नाही. यासोबत दररोज सूर्यास्ताला होणारा ध्वजारोहण कार्यक्रम आता भारतीय व पाकिस्तानी सैनिकांतील हस्तांदोलन प्रक्रियाही बंद केली आहे.

    Read more

    Water Treaty : द फोकस एक्सप्लेनर : सिंधू पाणी करार रद्द केल्याचा काय परिणाम होईल? पाकिस्तानचे काय हाल होतील? वाचा सविस्तर

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याला उत्तर म्हणून १९६०चा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याच्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या करारात काय समाविष्ट आहे? या करारासाठी कोणता देश सर्वात फायदेशीर आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न – तो खरोखर इस्लामाबादला मोठा धक्का देऊ शकतो का? यांची उत्तर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमधून जाणून घेऊयात….

    Read more

    The Focus Explainer : द फोकस एक्सप्लेनर: जो रद्द करण्याची धमकी देत आहे पाकिस्तान, या कृतीचा भारतावर काय परिणाम? वाचा सविस्तर

    जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही मोठे निर्णय घेतले. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही काही पावले उचलली – जसं की वाघा बॉर्डर बंद करणं, सार्क व्हिसा सुविधा थांबवणं आणि भारतीय विमानांसाठी आपली आकाशमर्यादा बंद करणं.

    Read more

    दहशतवाद्यांचा निषेध करत बीएसएफचा मोठा निर्णय; अटारी, हुसेनिवाला आणि सद्की येथील ‘रेट्रीट सेरेमनी’तील हस्तांदोलन बंद

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

    Read more

    Pakistan शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!

    शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!

    Read more