Mehul Choksi : मेहुल चोक्सी विरोधात SEBIची मोठी कारवाई ; सर्व काही होणार जप्त
बाजार नियामक सेबीने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीवर मोठी कारवाई केली आहे. सेबीने मेहुल चोक्सीची बँक खाती, म्युच्युअल फंड आणि शेअर्स जप्त करण्याचे आदेश दिले आहेत
बाजार नियामक सेबीने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीवर मोठी कारवाई केली आहे. सेबीने मेहुल चोक्सीची बँक खाती, म्युच्युअल फंड आणि शेअर्स जप्त करण्याचे आदेश दिले आहेत
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आता विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने ४ जून रोजी एक विजयी रॅली आयोजित केली होती
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक मोहिमेचा भाग म्हणून हे शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचले आहे. हे शिष्टमंडळ राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले तेव्हा तिथे एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.
प्रगत देशांची संघटना G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा झाला. काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी कारण नसताना मोदी सरकारवर आगपाखड करून घेतली.
ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त भाष्य केल्यानंतर गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस राजेश सोनी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे
तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. असा दावा केला जात आहे की दोघांनी ३ मे रोजी जर्मनीमध्ये लग्न केले. तथापि, हा सोहळा पूर्णपणे खासगी ठेवण्यात आला.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे. तो मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तथापि, तो विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याशिवाय इतर तीन जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या बंगळुरू पोलिस चौकशी करत आहेत. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि एमएनएम प्रमुख कमल हसन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन देखील उपस्थित होते
एनडीएच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तरुणांना संदेश दिला. त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना सक्षम करण्याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की आज तरुण राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचा मला आनंद आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लंगड्या घोड्याच्या विधानावरून मध्य प्रदेशात गोंधळ सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या शब्दांवर दिव्यांगांनी आक्षेप घेतला आहे आणि ते अपमानास्पद म्हटले आहे.
भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी पक्षविरोधी वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले – जे लोक राष्ट्रीय हितासाठी काम करणे पक्षविरोधी कृती मानतात, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे.
आरोपीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. Rekha Gupta विशेष प्रतनिधी नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून सध्या मोठी बातमी समोर आली […]
पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतात, अहमदिया मुस्लिमांना ईद साजरी करण्यापासून रोखण्यासाठी शपथपत्रे भरण्यास भाग पाडले जात आहे. पंजाबमध्ये, अहमदियांना इशारा देण्यात आला आहे की जर त्यांनी ईद साजरी केली तर त्यांना 5 लाख रुपये दंड भरावा लागेल.
नागपूरमधील कामगार विकास कार्यक्रमानिमित्त पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर दिसणारी राजकीय एकता कायम राहिली पाहिजे.
गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने आता पाण्यावरून अणुबॉम्ब युद्ध भडकवणारी भाषा केली. पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या अमेरिका भेटीत हे घडले.
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये कपात केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली.
शाळेची फी न भरल्याबद्दल ३१ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पब्लिक स्कूल, द्वारकाला फटकारले. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या एकल खंडपीठाने म्हटले की, शाळेची फी न भरल्याबद्दल मुलांना धमकावता येणार नाही. अशा कृती मानसिक छळासारख्या आहेत आणि विद्यार्थ्यांचा स्वाभिमान दुखावतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यावेळी RBI ने रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.५० टक्के कपात केली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून कठोर कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात अपप्रचार सुरु केला. याला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदार आणि निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले.
लोकसभा निवडणूक अजून 4 वर्षे लांब आहे. काही राज्यांच्या निवडणुका 2025 – 26 मध्ये आहेत, पण त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा दूरच्या राजकीय क्षितिजावर पण दिसत नव्हती.
राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या मेरीच्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!! असे एकाच दिवशी घडले.
अयोध्येचा राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दरबाराची आजपर्यंत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते श्रीराम दरबारातील भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमंत या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.
दक्षिण कोरियातील राष्ट्रपती निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या उदारमतवादी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरिया (DPK) चे नेते ली जे-म्युंग यांनी विजय मिळवला. त्यांनी सत्ताधारी पीपल पॉवर पार्टी (PPP) चे किम मून सू यांचा पराभव केला.
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, कॉलेजियम व्यवस्थेवर टीका केली जाऊ शकते, परंतु कोणत्याही व्यवस्थेत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ नये. न्यायाधीशांनी कोणत्याही बाह्य दबावापासून मुक्त राहिले पाहिजे.
संपूर्ण जगाला माहिती आहे की पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. पाकिस्तान सदैव जगातील बलाढ्य देशांकडे मदतीची याचना करताना दिसतो. कधी पैशासाठी, कधी संसाधनांसाठी आणि कधी अन्न आणि पाण्यासाठी, पाकिस्तान जगाकडे हात पुढे करण्यास मागेपुढे पाहत नाही.