Ajit Pawar लगेच कोंबड्या मारून जाळून टाकू नका! जीबीएसवर खुलासा करताना अजित पवार यांचे आवाहन
जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र, कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारून जाळून टाकण्याची गरज नाही
जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र, कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारून जाळून टाकण्याची गरज नाही
भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. मला तेव्हाच लोकांनी समजावलं की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील, अशी टीका त्यांनी केली आहे.बीडच्या लोकांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं होतं, असेही राऊत म्हणाले.
राज्यात सुरेश देशमुख प्रकरण सुरू असताना भाजपचे आमदार सुरेश धस आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बैठक झाली त्यावरून महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस यांना मॅनेज होणार नसल्याचे सर्टिफिकेट दिले.
महायुती सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर केली. मात्र, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे कॉलेजला अचानक भेट देऊन मुलींना फीमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. लवकरच राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद महापालिका अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची एक कोअर कमिटी स्थापन केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे मृद व जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदावर निवड झालेल्या राज्यभरातील 601 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिताना संबोधित केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणजे जणू ओसाड माळावरची जहागिरी असे आता त्याच पक्षाच्या नेत्यांना वाटू लागले आहे.
बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे खून प्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. एकूण ५ सदस्य असलेल्या या विशेष तपास पथकामध्ये १ पोलीस निरीक्षक आणि ४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी काँग्रेसमधलीच चार बडी नावे समोर आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या आढावा बैठक घेतली. या बैठकीत नवीन शहरांच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा दोन टप्प्यात विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यासाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी आणि ‘अर्बन ग्रोथ सेंटर’साठी 1526 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला
कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले.
उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागले, अडीच वर्षांत घरी गेले; मग एकनाथ शिंदे काय करतील आणि त्यांचे काय होईल??, असा सवाल शिंदेंच्या सत्कारानंतर समोर आला.
शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा आज राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. तसेच राजन साळवी हे गुरुवारी दुपारी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीमध्ये सरहद संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मात्र, यावरून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या या पुरस्कारवर टीका केली आहे. यावर तू असाच जळत रहा, एवढेच मी बोलेन, अशी टीका शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून योजना सुरळीत असल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पातळीवर प्रत्यक्ष भेट द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद करणार, ती योजना बंद करणार असे असे आरोप होत आहेत. आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही. ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आला आहे . त्यामुळे फिस्कल स्पेस कमी झाली आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार नाही.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!, हे सत्य स्वीकारण्याची वेळ महाराष्ट्रातल्या दोन दिवसात मधल्या घडामोडींनी आली. शरद पवारांनी राजधानी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. पवारांनी हा बाण भाजपच्या दिशेने सोडला होता, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना घायाळ झाली. संजय राऊत यांनी उतावीळपणे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शरद पवार यांना “टार्गेट” केले. शरद पवारांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. फक्त सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या बाजूने उभ्या राहिल्या.
राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पालकांवर केलेल्या अश्लील विनोदांबद्दल रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि इतरांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने आरोपींना समन्स पाठवले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले; माध्यमनिर्मित चाणक्याचे “नवे डाव” सुरू झाले, पण अखेर ते भाजपच्याच हातातले “खेळणे” बनले!!, हे सत्य स्वीकारायची वेळ शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून आणली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुचकारून शरद पवारांनी भाजप वर बाण सोडला, पण यातून भाजप घायाळ व्हायच्या ऐवजी ठाकरे सेनाच घायाळ झाली. पवारांचा मिठी छुरीचा “राजकीय हल्ला” शिंदेंनी चतुराईने परतावला
दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालावी का? सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. सोमवारी न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून यावर ३ आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप झाले की लगेच राजीनामा घेण्याची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची भूमिका मांडली आहे.
परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचे काम मी करत होतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे. मोर्चा शांत करण्याचा प्रयत्न मी करत होतो. मात्र जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.