RSS centenary : संघाच्या शताब्दीच्या वर्षात diplomatic mission जोरात!!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तनाचा सूत्रपात केला असला, तरी संघाने तेवढ्यापुरताच शताब्दी वर्षाचा उपक्रम मर्यादित ठेवलेला नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तनाचा सूत्रपात केला असला, तरी संघाने तेवढ्यापुरताच शताब्दी वर्षाचा उपक्रम मर्यादित ठेवलेला नाही.
राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहे. राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे 83000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला
ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून थेट मुंबई गाठायचा बेत केलेल्या मनोज जरांगे यांनी आज अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातले फडणवीस सरकार उलथवण्याची भाषा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला काय अडचण आहे?” या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच, शिंदे गटावर सडकून टीका करत त्यांना ‘काळे मांजर’ असे संबोधले. शिवाय धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी मटण खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते, असे वक्तव्य सुळे यांनी केले होते. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्याआधी बीडमध्ये त्यांनी इशारा सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येत आहोत, तेव्हा काय करायचे ते करा, असे म्हणत आव्हान केले आहे. आता मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंची मतदारसंघात बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10-15 लाख रुपये देतात, असा आरोप हाके यांनी केला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावले, कार्यकर्त्यांना कामाला लावावे. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचे काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरेतर लोकांनी तुम्हाला दिले नाही, तुम्ही दगाबाजी करून ते घेतल्याची टीका महाजन यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही
त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला ज्या प्रकारे लुटले आहे, ते सर्वांसमोर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी आरोप केला की, “पहिल्या वर्षी ६०८० कोटींचा घोटाळा आणि दुसऱ्या वर्षी ६००० कोटींचा घोटाळा त्यांनी केला आहे.”
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्मासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो. आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी महायुती सरकारवरही अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्या दिंडोरी येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या.
२०१६-१७ पासून मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. याबाबी मी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोरही मांडल्या होत्या. पण, ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर परदेशातूनही दबाव येईल अन् सत्ताधाऱ्यांना जाग येईल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या योजनेतून शहराला ३६५ दिवस २४X७ शाश्वत पाणीपुरवठा करता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद उपक्रमातून देशातल्या विविध राज्यांच्या महिला आयोगांची एकजूट बांधली. या एकजुटीतून सुरक्षिततेबरोबरच सक्षमीकरण आणि शक्तीचाही आत्मविश्वास महिलांना दिला
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड फटका बसलेला आहे व त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे सगळ्यात जास्त नुकसान हे शेतीचं झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागण्या सध्या जोर धरत आहेत. अशातच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतली बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली, अन् बॅलेट पेपरवरील निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंच्या वाट्याला पराभवच आला. या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे फडणविसांच्या भेटीला गेले होते. आता त्याच पाठोपाठ अमित ठाकरेंनी देखील आशिष शेलारांची भेट घेतली आहे.
सध्या देशभरात नवीन उपराष्ट्रपती नेमकं कोण होणार यावर सतत काही ना काही चर्चा चालू आहे. एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले, तर इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. पवार आणि ठाकरे गट हे नक्षल कनेक्शन असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? असा सवाल भाजपाने केला होता. त्यावर शरद पवारांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
साऊंड सिस्टीम लावण्याच्या किरकोळ वादातून कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले. सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री जमावाने हाणामारी, दगडफेक केली तसेच अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांना पेटवले. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हैदोस घातला होता. रस्ते पाण्याखाली गेले, घरे कोसळली, शाळा बंद राहिल्या आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात लोकांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले होते. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने नवीन इशारा दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील ९ जणांची कराड (जि.सातारा) विधानसभेच्या मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नावे असल्याचा आरोप कराडचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी केला.
राष्ट्रीय महिला आयोगाने एक व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन जो शक्ती संवाद सुरू केलाय, त्याचा दुसरा उपक्रम मुंबईत होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्ती संवादाच्या निमित्ताने झालेले चिंतन महिलाविषयक धोरणात परावर्तित करण्याची ग्वाही दिली.
अनेक महिने होऊन गेले तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटत नाहीये. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती मधील नेत्यांमध्येच रस्सीखेच चालू असल्याचं दिसून येतंय. पालक मंत्री पदासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परंतु शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना विरोध केला आहे.
देशात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी मिळालेली आहे. परंतु रेड्डी यांचे नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.