• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    HSRP : राज्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा; HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर

    राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र वाहन मालकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता ही अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

    Read more

    Pune Police : पुण्याचे पोलीस केवळ दंड वसूल करण्यासाठी आहेत का ?

    पुण्यात खासगी वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप पोलीस यंत्रणेकडून सतत केला जातो. परंतु पुणेकरांना खड्डे आणि अतिक्रमणमुक्त रस्ते मात्र मिळत नाही.

    Read more

    मुंबईत बीडीडी चाळवासीयांची स्वप्नपूर्ती; 556 घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज माटुंगा, मुंबई येथे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 चाळवासीयांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चावीचे वितरण करण्यात आले.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे अखेर ‘सातपुडा’ बंगला सोडणार? पण दंडाचं काय?

    धनंजय मुंडे यांचा ‘सातपुडा’ बंगला सोडण्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. मुंबईत स्वतःच घर असूनही शासकीय बंगला सोडत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर आता मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे.

    Read more

    Ajit Pawar : महायुती सरकार धारावी प्रकल्प पूर्ण करणारचं; अजित पवारांची ग्वाही !

    बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील ५५६ पुनर्वसित सदनिकांचे आज (१४ ऑगस्ट) वितरण झाले. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. 

    Read more

    Dhananjay Munde : या मुंडेंच्या नावावर नक्की किती घरं?

    धनंजय मुंडे यांच्या नावावर मुंबई येथील गिरगांव भागात एक आलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलंय. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईत त्यांच्या नावावर अजून ३ ते ४ फ्लॅट असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

    Read more

    काका + पुतण्यांच्या पक्षांचे गुंडगिरीला सारखेच प्रोत्साहन; मारामाऱ्या करणाऱ्या नितीन देशमुख + सुरज चव्हाणना दिले प्रमोशन!!

    काका + पुतण्यांच्या पक्षांचे गुंडगिरीला सारखेच प्रोत्साहन; मारामाऱ्या करणाऱ्यांना दिले प्रमोशन!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडल्याचे समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचे प्रमोशन केले

    Read more

    Owaisi Aaditya Thackeray : स्वातंत्र्यदिनी मांस दुकानांवर बंदी; ओवैसी म्हणाले- याचा मांसाहाराशी काय संबंध, आदित्य ठाकरे म्हणाले- आम्ही नवरात्रीतही मांस खातो

    महाराष्ट्रानंतर तेलंगणात १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी झाल्यानंतर वाद निर्माण झाला. गेल्या तीन दिवसांत, जुने हैदराबाद शहर महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका व्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासनाने असे आदेश जारी केले.

    Read more

    Karuna Munde : मुंडेंना माझ्या फ्लॅटमध्ये राहू द्या, मी निघून जाईन; करुणा मुंडेंचा टोला; म्हणाल्या – 6 महिन्यात त्यांची आमदारकी रद्द होणार

    धनंजय मुंडे यांनी लाज सोडली आहे. त्यांचे मुंबईत मलबार हिल, हिरानंदानी मध्ये फ्लॅट आहे. माझा फ्लॅट हा देखील त्यांचाच आहे. त्यांना जर हिरानंदानी आणि मलबार हिलच्या फ्लॅटमध्ये रहावे वाटत नसेल तर त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये येऊन राहू शकतात, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कधीच येणार नाही. 6 महिन्यांच्या आतमध्ये त्यांची आमदारकी रद्द होणार आहे. कालच त्यांना औरंगाबाद हायकोर्टाने 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे.

    Read more

    Fadnavis : समाजाच्या आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे; कबुतरखानाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

    Read more

    Manoj Jarange : दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसा; मनोज जरांगे यांचा मागे न हटण्याचा निर्धार; महाराष्ट्र कायमचा बंदचाही इशारा

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

    Read more

    Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा जातीयवाद, ब्राह्मण समाजावर टीका करताना पेशव्यांवरही साधला निशाणा

    शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव आणि ब्राम्हण सहाय्यक संघात सध्या वाद सुरू आहे. अत्यंत जातीयवादी भूमिका मांडताना जाधव यांनी पेशव्यांवरही निशाणा साधला आहे.

    Read more

    रोहित पवारांनी पाजळली “राजकीय “विद्वत्ता”; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पाजळली राजकीय विद्वत्ता; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!, असं खरंच घडलं.

    Read more

    भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य; ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले यांचे अभिष्टचिंतन!!

    पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. तेथील भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

    Read more

    दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यांत उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!

    दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यात उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!, असला प्रकारात बारामतीत घडला. हुल गांधींच्या मतांच्या चोरीच्या आरोपांना वेगळे वळण देण्यासाठी शरद पवारांनी दोन लोक आपल्याला भेटल्याची स्टोरी माध्यमांना सांगितली होती, पण त्या संदर्भात निवडणूक आयोग आपल्याकडे पुरावे आणि तक्रारीची मागणी करेल हे लक्षात येताच खुद्द पवारांनी नंतर तो विषय “गुंडाळून” टाकला. महाराष्ट्रातील त्यावरची चर्चा देखील त्यांनी “आपल्या पद्धतीने” थांबवली. परंतु, बारामतीत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी फक्त दोन वाक्यांमध्ये उत्तर देऊन त्यांनी देखील हात वर केले.

    Read more

    Karuna Sharma : मुंडेंना अजूनही सरकारी बंगला सोडवेना, करुणा शर्मांनी काय ऑफर दिली?

    धनंजय मुंडे यांनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र असे असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांनी ‘सातपुडा’ हे शासकीय निवासस्थान अजूनही रिकामं केलेलं नाही.

    Read more

    15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा चव्हाण + पवारांचा निर्णय 1988 पासून लागू; पण 2025 मध्ये आव्हाड + राऊतांनी उकरून काढला वाद!!

    स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी सुनावल्यावर अजित पवारांनी दिले महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे मोदी- शहा यांना श्रेय

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, अशा शब्दांत त्यांना सुनावले होते.

    Read more

    Fadnavis : फडणवीस सरकारचे निर्णय- महाराष्ट्रात 15 हजार पोलिसांची भरती; विविध कर्ज योजनांतील जामीनदाराची अटही शिथिल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या महत्त्वकांक्षी प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील हजारो तरुण गत अनेक वर्षांपासून या पोलिस भरतीची प्रतिक्षा करत होते. अखेर सरकारने हा निर्णय हातावेगळा करून त्यांची मागणी पूर्ण केली आहे. प्रस्तुत निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

    Read more

    Lakshman Hake : मनोज जरांगेंचा मुंबईत दंगल घडवण्याचा डाव; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा दावा, त्यांना आंतरवाली सराटीत रोखण्याचे आवाहन

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.

    Read more

    Mahayuti MLA Sanjay Gaikwad : आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही; लोकप्रिय योजनांचा फटका, संजय गायकवाड यांचा दावा; मंत्री सरनाईकांनी फेटाळला

    महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.

    Read more

    Ajit Pawar : 15 ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यांत मांसाहारावर बंदी; अजित पवार म्हणाले- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अशी बंदी घालणे उचित नाही

    स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी सुद्धा हा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Kalyan Dombivli : 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत नॉन-व्हेज बंदी; आदित्य ठाकरेंचा कडकडून विरोध

    स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

    Read more

    Parinay Phuke : बेताल विधाने करून मनाेज जरांगेंचा मीडियामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न, परिणय फुके यांची टीका

    निवडणुका आल्या की मनोज जरांगे पाटील बाहेर पडतात. काहीतरी बेताल विधाने करून, आरोप-प्रत्यारोप करून स्वत:ला मीडियामध्ये चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केला.

    Read more

    Khokya Bhosale : खोक्या भोसलेची रवानगी आता हार्सूल कारागृहात

    एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.

    Read more