• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका, मतदारयाद्या तपासण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच, शिंदे गटावर सडकून टीका करत त्यांना ‘काळे मांजर’ असे संबोधले. शिवाय धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Read more

    Nitesh Rane : सुप्रिया सुळेंच्या मटणावरील विधानावरून नितेश राणेंची टीका- दुसऱ्या धर्मासाठी असे भाषण केले तर चिरफाड होईल

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी मटण खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते, असे वक्तव्य सुळे यांनी केले होते. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे.

    Read more

    Lakshman Hake : मनोज जरांगेंना बैठकीसाठी आमदार 10-15 लाख रुपये देतात; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्याआधी बीडमध्ये त्यांनी इशारा सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येत आहोत, तेव्हा काय करायचे ते करा, असे म्हणत आव्हान केले आहे. आता मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंची मतदारसंघात बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10-15 लाख रुपये देतात, असा आरोप हाके यांनी केला आहे.

    Read more

    Girish Mahajan : गिरीश महाजन यांचा आरोप- उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले

    मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावले, कार्यकर्त्यांना कामाला लावावे. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचे काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरेतर लोकांनी तुम्हाला दिले नाही, तुम्ही दगाबाजी करून ते घेतल्याची टीका महाजन यांनी केली आहे.

    Read more

    Jarange : जरांगे म्हणाले- ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू; 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन

    मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही

    Read more

    Aditya Thackeray : मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

    त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला ज्या प्रकारे लुटले आहे, ते सर्वांसमोर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी आरोप केला की, “पहिल्या वर्षी ६०८० कोटींचा घोटाळा आणि दुसऱ्या वर्षी ६००० कोटींचा घोटाळा त्यांनी केला आहे.”

    Read more

    हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही, नितेश राणेंची सुप्रिया सुळेंना ताकीद

    दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्मासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य- माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते:तुम्हाला काय प्रॉब्लेम?

    मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो. आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी महायुती सरकारवरही अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्या दिंडोरी येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या.

    Read more

    Raj Thackeray : मतांमध्ये गडबबडीचा आरोप करत लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची राज ठाकरेंची भाषा

    २०१६-१७ पासून मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. याबाबी मी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोरही मांडल्या होत्या. पण, ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर परदेशातूनही दबाव येईल अन् सत्ताधाऱ्यांना जाग येईल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

    Read more

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना डिसेंबरपर्यंत करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या योजनेतून शहराला ३६५ दिवस २४X७ शाश्वत पाणीपुरवठा करता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Read more

    Shakti Samvad : राष्ट्रीय महिला आयोगाने राज्यांच्या महिला आयोगांची बांधली एकजूट; सुरक्षितता आणि सक्षमीकरणाबरोबरच महिलांना दिला शक्तीचा आत्मविश्वास!!

    राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद उपक्रमातून देशातल्या विविध राज्यांच्या महिला आयोगांची एकजूट बांधली. या एकजुटीतून सुरक्षिततेबरोबरच सक्षमीकरण आणि शक्तीचाही आत्मविश्वास महिलांना दिला

    Read more

    Pasha Patel : शेतकर्‍यांनो आता नुकसान भरपाईची सवय लावून घ्या; पाशा पटेल यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड फटका बसलेला आहे व त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे सगळ्यात जास्त नुकसान हे शेतीचं झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागण्या सध्या जोर धरत आहेत. अशातच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

    Read more

    Thackeray : ठाकरे पितापुत्र भाजपा नेत्यांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

    काही दिवसांपूर्वीच मुंबईतली बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली, अन् बॅलेट पेपरवरील निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंच्या वाट्याला पराभवच आला. या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे फडणविसांच्या भेटीला गेले होते. आता त्याच पाठोपाठ अमित ठाकरेंनी देखील आशिष शेलारांची भेट घेतली आहे.

    Read more

    Sanjay Raut : राऊत-पवारांची भूमिका केवळ संकुचितपणा आणि राजकीय द्वेष; भाजपाची टीका

    सध्या देशभरात नवीन उपराष्ट्रपती नेमकं कोण होणार यावर सतत काही ना काही चर्चा चालू आहे. एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले, तर इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. पवार आणि ठाकरे गट हे नक्षल कनेक्शन असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? असा सवाल भाजपाने केला होता. त्यावर शरद पवारांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    Read more

    Kolhapur : किरकोळ वादातून कोल्हापुरात दंगल, वाहनांची जाळपोळ

    साऊंड सिस्टीम लावण्याच्या किरकोळ वादातून कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले. सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री जमावाने हाणामारी, दगडफेक केली तसेच अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांना पेटवले. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

    Read more

    महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

    विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात हवामान विभागाचा इशारा : पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांमध्ये वादळ, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हैदोस घातला होता. रस्ते पाण्याखाली गेले, घरे कोसळली, शाळा बंद राहिल्या आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात लोकांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले होते. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने नवीन इशारा दिला आहे.

    Read more

    Fadnavis पृथ्वीराज चव्हाण कुटुंबातील ९ मतदारांची दुबार नावे; खरे व्होट चोर समोर, राहुल यांनी उत्तर द्यावे- मुख्यमंत्री फडणवीस

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील ९ जणांची कराड (जि.सातारा) विधानसभेच्या मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नावे असल्याचा आरोप कराडचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी केला.

    Read more

    शक्ती संवादातले चिंतन महिला विषयक धोरणात परावर्तित करायची ग्वाही मुख्यमंत्री देतात तेव्हा…

    राष्ट्रीय महिला आयोगाने एक व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन जो शक्ती संवाद सुरू केलाय, त्याचा दुसरा उपक्रम मुंबईत होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्ती संवादाच्या निमित्ताने झालेले चिंतन महिलाविषयक धोरणात परावर्तित करण्याची ग्वाही दिली.

    Read more

    Chagan Bhujbal : महायुतीमधील नेत्यांनाच भुजबळ जड झालेत ?

    अनेक महिने होऊन गेले तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटत नाहीये. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती मधील नेत्यांमध्येच रस्सीखेच चालू असल्याचं दिसून येतंय. पालक मंत्री पदासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परंतु शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना विरोध केला आहे. 

    Read more

    vice president : आघाडीच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारावर नक्षलवादी कनेक्शन असल्याचा आरोप !

    देशात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी मिळालेली आहे. परंतु रेड्डी यांचे नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.

    Read more

    Pune : पुण्यातील बहाद्दराने चक्क दिल्लीला जाऊन भरला उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज !

    सध्या देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही पुढील महिन्यात होणार असल्याने एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनी आता आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी चक्क पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या एका तरुणाने देखील अर्ज दाखल केला आहे.

    Read more

    Anjali Damania : कृषी घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानियांचा गंभीर आरोप- धनंजय मुंडेंनी व्ही. राधांच्या रिपोर्टची फाइल गायब केली!

    धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची आणि गौडबंगालाची फाइल गायब केली आहे, असा आरोप आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कृषी विभागावरचे आरोप चर्चेत आलेत.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे फडणवीसांना आवाहन- अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा; माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? बुडणारी शहरं वाचवा!

    अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती. त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राज म्हणाले.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानियांनी केले भाकीत- सप्टेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; शिंदेंचा भाव वाढणार, राज भाजपसोबत जातील

    आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे केले आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होईल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.

    Read more