• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले; पवारांचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले!!

    मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सुटले. सोनिया गांधी प्रणित काँग्रेसचा हिंदू दहशतवादाचा narrative उद्ध्वस्त झाला. याबद्दलचा संताप काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त उमटला. त्यामुळे तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले आणि पवार बुद्धीचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले, असे महाराष्ट्रात घडून आले.

    Read more

    CM Fadnavis : पुण्यातील दादागिरी विकासातील सर्वात मोठा अडथळा; मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘दादांना’ इशारा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या वाढत्या दादागिरी बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पुण्याच्या विकासातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तसेच, अशा दबावामुळे उद्योगपतींच्या खर्चावर आणि व्यवसाय धोरणावर परिणाम होतो, ज्यामुळे ते जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाहीत.

    Read more

    Prithviraj Chavan : भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा, माजी CM पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य; शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

    भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या विधानाचे देशाच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. विशेषतः मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान- अटक करून दाखवाच; फडणवीसांचेही प्रत्युत्तर- अर्बन नक्षलीसारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल

    अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यावरून फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जो कायद्याने राहतो, त्याला अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, कायदा न वाचता आलेली ही कॉमेंट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तुम्ही अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल, अशा शब्दात फडणवीसांनी सुनावले आहे.

    Read more

    पृथ्वीराज चव्हाणांच्या सनातनी आतंकवाद या विधानावरुन प्रकाश महाजनांनी त्यांना सुनावले; शिंदे सेनाही आक्रमक

    राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाने 2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा निकाल दिला. पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.

    Read more

    मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाउन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!

    मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाऊन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!, असे महाराष्ट्राच्या राजकारणातले चित्र निर्माण झालेय.

    Read more

    राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेकाप ठाकरे बंधूंच्या दारी; संभाजी ब्रिगेडची दोरी पवारांच्या हाती!!

    महाराष्ट्रात राजकीय फेरमांडणी व्हावी आणि आपापल्या पक्षांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी दोन मोठ्या राजकीय हालचाली आज घडल्या. राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेतकरी कामगार पक्ष ठाकरे बंधूंच्या दारी गेला, तर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड शरद पवारांना घरी जाऊन भेटून आले. दोन्ही ठिकाणी राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने शेकाप आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी दोन राजकीय घराण्यांचा आश्रय घेतला.

    Read more

    पवारांबरोबर जाऊन जयंत पाटलांना मिळाला धोका; म्हणून शेकापने ठाकरे बंधूंच्या बरोबर श्रावणात बांधला राजकीय झोका!!

    शरद पवारांबरोबर जाऊन जयंत पाटलांना मिळाला धोका; म्हणून आता शेकापने ठाकरे बंधूंच्या बरोबर जाऊन श्रावणात बांधला राजकीय झोका!!, असे राजकीय चित्र आज रायगड जिल्ह्यात दिसले.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- संस्कृत ही सर्व भाषांची जननी, ती बोलीभाषा बनवणे आवश्यक; फक्त समजायला नको तर बोलली पाहिजे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी सांगितले की, संस्कृत ही भारतातील सर्व भाषांची जननी आहे. आता ती बोलली जाणारी भाषा बनवण्याची वेळ आली आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, संस्कृत केवळ समजली पाहिजे असे नाही तर ती कशी बोलायची हे देखील माहित असले पाहिजे.

    Read more

    Rohini Khadse रोहिणी खडसे आणि शरद पवारांची भेट, खेवलकरांचा जामीन की आणखी काही?

    रोहिणी खडसे यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. सध्या पुणे रेव्ह पार्टी प्रकरणामुळे प्रांजल खेवलकर हे नाव चर्चेत असतानाच रोहिणी खडसे आणि शरद पवार यांची भेट ही देखील आता चर्चेचा विषय ठरत आहे.

    Read more

    Mumbai High Court : घटस्फोटाच्या प्रकरणात पतीला नपुंसक म्हणणे मानहानी नाही; मुंबई हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळली

    मुंबई उच्च न्यायालयाने एका पतीने आपल्या पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध दाखल केलेली मानहानीची तक्रार फेटाळून लावली आहे. घटस्फोटाच्या कारवाईदरम्यान पत्नीने आपल्या पतीला नपुंसक म्हटले, तर तिला मानहानी मानता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    Read more

    पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलीय, माईंडसेट बदलावा लागेल; पण फडणवीस साहेब, आधी नेतृत्वातले घुसखोर बाहेर काढावे लागतील!!

    पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलीय. आमच्याच लोकांना कंत्राटे द्या. आमच्याच लोकांना कामावर ठेवा. आम्ही सांगू त्याच पद्धतीने काम करा हा माईंडसेट बदलावा लागेल

    Read more

    Anil Ambani : अनिल अंबानींना ईडीची लूकआउट नोटीस; 5 ऑगस्ट रोजी चौकशी, देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही

    ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लूकआउट नोटीस जारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अंबानी यांना तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी नाही. जर त्यांनी परदेशात प्रवास करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना विमानतळ किंवा बंदरांवर ताब्यात घेतले जाऊ शकते.

    Read more

    CM Fadnavis : मेळावा झाला म्हणून प्रक्षोभक पोस्टचे स्वातंत्र्य मिळते का? यवत तणावावर मुख्यमंत्र्यांची नाराजी; अजित पवारांची घटनास्थळी पाहणी

    पुण्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

    Read more

    Daund Yavat : दौंडच्या यवतमध्ये 2 समाजात वाद अन् तणाव; आक्षेपार्ह पोस्टनंतर दगडफेक-जाळपोळ; पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

    पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथे दोन गटांत जातीय तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा वाद भडकला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या घटनेची मा

    Read more

    रामकुंडावर गोदावरी आरती आणि समरसता संध्या संपन्न; शीख समाजाच्या घोषणांनी दुमदुमला रामघाट!!

    पावन गोदावरी तीर्थावर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने आयोजित गोदावरी आरती आणि समरसता संध्या हा विशेष सोहळा उत्सवी आणि भावपूर्ण वातावरणात अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला.

    Read more

    श्यामची आई 71 वर्षांनंतरही दिल्लीत सुपरहिट; राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!

    श्यामची आई 71 वर्षानंतरही दिल्लीत सुपरहिट राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!, असे आज घडले. साने गुरुजींच्या श्यामच्या आईने 71 वर्षांपूर्वी 1954 मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्ण कमळ पटकावले होते

    Read more

    Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा

    पुणे येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह इतर सहा जणांना देखील ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून पोलिसांनी खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांच्यासह चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Read more

    Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा सिंह कोर्टात भावुक म्हणाल्या- भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल; संन्यासी असूनही बदनामी केली

    भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयातच रडू कोसळले होते. मी संन्यासी आयुष्य जगले तरी देखील माझी बदनामी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या वरून भगव्या रंगाची बदनामी करण्यात आली. मात्र आज त्याच भगव्या रंगाचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Mithi River : मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई; मुंबईतील 8 जागांवर छापेमारी

    मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. मिठी नदीतून काढलेल्या गाळाचे डंपिंग आणि विल्हेवाट लावण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला बनावट सामंजस्य करार सादर केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदारांशी संबंधित असलेल्या जागांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

    Read more

    Jitendra Awhad : हेमंत करकरे यांची हत्या झाली तेव्हाच निकाल लागला; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर 65 किलो आरडीएक्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे. आतंकवादाला जात, धर्म, रंग, पंथ नसतो. तसेच आतंकवादाला धर्माचे नाव चिकटवणे योग्य नाही हे आधीपासून आम्ही सांगत आहोत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस मालेगाव निकालावर म्हणाले- UPA चे षडयंत्र उघडे पडले, काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी

    विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

    Read more

    Malegaon Blast मालेगाव बॉम्बस्फोट- NIA कोर्टाने म्हटले- दुचाकी प्रज्ञांची आणि कर्नल RDX घेऊन आले, या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता.

    Read more

    Manikrao Kokate रमी प्रकरणात कोकाटेंवर कारवाई; कृषी खाते गेले, क्रीडा मिळाले; भरणेंची कृषी खाते देऊन नाराजी दूर

    विधानसभेत अधिवेशनादरम्यान रमी (पत्ते) खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वादात अडकलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अखेर कारवाई झाली आहे.

    Read more

    रामकुंडावर राष्ट्रभावनेची आरती; उद्या 1 ऑगस्टला गोदावरी सेवा समितीच्या आयोजनात सिख परंपरेचे संत, राष्ट्रीय मान्यवर सहभागी

    श्रावणमासाच्या पावन संध्याकाळी गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने उद्या १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार, सायंकाळी ६ वाजता रामकुंड गोदावरी तीरावर गोदावरी महाआरती संपन्न होणार आहे.

    Read more