• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Ajit Pawar : विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नाही, दारू दुकानांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका

    राज्यात ३२८ नवीन दारू दुकानांचे परवाने देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये, असा नियम आम्ही बनवला आहे. आता ज्यांना दारूचे दुकान काढायचे आहे आणि परवाना मिळवायचा आहे त्यांना विधिमंडळाला याबाबत पहिली सूचना द्यावी लागणार आहे. विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय दारू दुकानांचे परवाने दिले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

    Read more

    भाजप मधल्या टॅलेंटची सुप्रिया सुळेंना “चिंता”; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला का उपयोग होईना??

    भाजप मधल्या टॅलेंट ची सुप्रिया सुळेंना चिंता;; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला उपयोग का होईना??, असा सवाल सुप्रिया सुळे यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आला.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : भाजप खालच्या थराचे कृत्य करत नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणातील आरोप

    संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. आमचा पक्ष अशा खालच्या थराचे कृत्य करत नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळले आहेत.

    Read more

    शरद पवारांच्या घरातल्याच दोघांची परस्पर विरोधी वक्तव्ये; जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीतल्या गोंधळात भर!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याविषयी संभ्रम वाढला असून त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात शरद पवारांच्या घरातूनच दोन परस्पर विरोधी वक्तव्ये समोर आली.

    Read more

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे + पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ??

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ येणार का??, असा सवाल विचारायची वेळ खुद्द अजित पवारांच्या वक्तव्याने आली.

    Read more

    Akkalkot Attack : अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया- माझ्या हत्येचाच कट होता, हल्ल्यामागे सरकारच जबाबदार

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

    Read more

    Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- जनसुरक्षा विधेयक सर्वानुमते मंजूर; ते संविधानाला न मानणाऱ्या शक्तीविरोधात

    महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेले विशेष जन सुरक्षा विधेयक हे संविधानाला न मानणाऱ्या शक्ती विरोधात कारवाई करण्यासाठी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वांनुमते ते मंजूर करण्यात आले असून कायदा न वाजता यावर टीका करणाऱ्यांनी एकदा कायदा वाचावा. कायदा समजून घेतल्यानंतर कोणीही या विधेयकावर टीका करणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

    Read more

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या ऐतिहासिक नाटकाच्या पुण्यातील पहिल्याच प्रयोगात मोठा वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या प्रयोगादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला.

    Read more

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    मागच्या सात महिन्यांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. शनिवारी त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी सातारा जिल्ह्यातील विधान परिषदेवरील आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती शरद पवारांनी केली, अशा बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर झळकल्या.

    Read more

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!

    महाराष्ट्रातल्या महापालिका जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होवोत, 2025 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत घ्यावा लागणार हे लक्षात घेऊन महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापली राजकीय बांधबंदिस्ती सुरू केली, पण यातला महायुतीचा खरा फॉर्म्युला कुणीच सांगितला नाही, तो म्हणजे ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!, हा तो फॉर्म्युला आहे.

    Read more

    Devendra Fadanvis : जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर लँडिंग करण्यासाठी नवी मुंबईहून टेक ऑफ!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत विमानतळाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतला.

    Read more

    आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळाला 35 कोटी रुपये उत्पन्न

    आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या.

    Read more

    जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांच्या अनुकूल प्रतिक्रिया; मग खोडसाळपणा केला कुणी??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या आज सकाळपासून दुपारपर्यंत सगळ्या महाराष्ट्रभर फिरल्या. त्यानंतर बराच वेळाने शरद पवारांनी कालच नेमलेले राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला. करून जयंत पाटील आजही प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या चालवायला लावून कुणीतरी खोडसाळपणा केला, असा राग काढला.

    Read more

    Jayant Patil पदमुक्त झाल्यावर जयंत पाटलांभोवती घट्ट झाले संशयाचे जाळे; अनेकांना करावे लागताहेत वेगवेगळे खुलासे!!

    पदमुक्त झाल्यावर जयंत पाटलांभोवती घट्ट झाले संशयाचे जाळे; अनेकांना करावे लागताहेत वेगवेगळे खुलासे!!, अशी अवस्था राष्ट्रवादीचे पदमुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भोवती तयार झालीय.

    Read more

    Jayant Patil जयंत पाटील पदमुक्त, शशिकांत शिंदेंना पदोन्नती; पण जयंत पाटलांची पावले राष्ट्रवादीतच राहणार, की…??

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर तब्बल सात वर्षे काम करून कंटाळलेले जयंत पाटील आज अखेर पद मुक्त झाले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना ते प्रदेशाध्यक्षपदी निवडले गेले होते.

    Read more

    Raj Thackeray : जागतिक वारसा स्थळांचा नुसता आनंद साजरा करू नका, जबाबदारीचं भान ठेवा, गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकाम पाडा!!

    हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला, पण याचा फक्त आनंद साजरा करू नका

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले- अजितदादा पवार महाजातिवादी; राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकतात

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला होता. तर एका नेत्याने त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांची पुन्हा जीभ घसरल्याचे समोर आले आहे.

    Read more

    Sanjay Gaikwad : कँटीन मारहाणप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; म्हणाले- कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, आय डोन्ट केअर

    आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर आज अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. यामुळे त्यांच्या अडचणींत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. पण गायकवाड यांनी चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला त्याची परवा नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

    Read more

    Thackeray : उद्धव ठाकरेंची जनसुरक्षा विधेयकात बदल करण्याची मागणी, म्हणाले- ते जनतेच्या सुरक्षेसाठी नाही

    उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे या विधेयकाचे नाव ‘जनसुरक्षा विधेयक’ऐवजी ‘भाजप सुरक्षा विधेयक’ ठेवा असा टोला, उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनसुरक्षा विधेयकात काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

    Read more

    Shivaji Maharaj Forts : शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत; रायगड, शिवनेरीसह महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश

    महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

    Read more

    Pune ISIS : पुणे आयसिस स्लीपर मॉड्यूल प्रकरणातील अकरावा संशयित रिझवान अली अटकेत; एनआयए कडून दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई

    पुण्यात उघडकीस आलेल्या आयसिस स्लीपर मॉड्यूल प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या दहशतवादी कटात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने अकरावा संशयित रिझवान अली उर्फ अबू सलमा उर्फ मौला याला अटक केली आहे. देशात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराचा कट रचणाऱ्या या गटात रिझवानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे NIA च्या तपासात स्पष्ट झाले आहे.

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेत पाठिंबा, तिथे विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा विधेयकाला विरोध!!

    राज्यातल्या फडणवीस सरकारने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभेत पाठिंबा दिला. तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनीच फक्त जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात अधिकृत मत नोंदविले.

    Read more

    जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसच्या 16 आमदारांचा पाठिंबा; पण केंद्रीय नेते नाराज झाल्याचा दावा!!

    महाराष्ट्रात फडणवीस सरकारने जन सुरक्षा कायदा विधानसभेत मंजूर करून घेतला त्यावेळी विरोधी पक्षांपैकी फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी त्या कायद्याला अधिकृतपणे विरोध केला त्यांचे विरोधी मत विधानसभा अध्यक्षांना नोंदवावे लागले. त्यामुळे तो कायदा आवाजी मतदानाने मंजूर झाला असला तरी तो एकमताने मंजूर झाल्याचा दावा सरकारला करता आला नाही.

    Read more

    Rupali Chakankar : शहापूर शाळाप्रकरणी शाळेची मान्यता रद्द झाली तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये – रूपाली चाकणकर

    शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

    Read more

    Shankaracharya : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले- ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले, इथल्या लोकांनी त्यांना स्वीकारले

    मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. देशभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या भूमिकेवर टीका केली आहे.

    Read more