माणूस व्यक्त होण्यासाठी सतत धडपडत असतो. संवादाशिवाय त्याची मानसिक भूक भागत नाही. कुणाशी तरी बोलल्याशिवाय आपल्याला बरे वाटत नाही. महाविद्यालयात संवाद हा विषय शिकविताना चार प्रकारच्या संवादाची कल्पना केली जाते. दोन व्यक्तींमधला संवाद, एका व्यक्तीचा समूहाशी होणारा संवाद, समूहातील अनेक सदस्यांचा इतर अनेक सदस्यांशी होणारा संवाद आणि व्यक्तीचा स्वत:शीच होणारा संवाद, म्हणजे आत्मसंवाद. संशोधकांच्या म्हणण्यानुसार आपण सतत कुणाशी ना कुणाशी संवाद साधत असतो. यात हावभाव करणे, पत्र पाठवणे, फोन करणे, इंटरनेटच्या माध्यमातून चाट करणे किंवा इतरांशी प्रत्यक्ष बोलणे, हे सर्व प्रकार येतात. Listen to your inner voice sometime while constantly expressing
कधी आपण एकाच वेळी अनेकांशीही संवाद साधत असतो. शास्त्रज्ञांच्या मते मात्र या वेगवेगळ्या संवादाची गोळाबेरीज केली असता होणा-या एकूण संवादापेक्षा कितीतरी पट अधिक होत असतो तो आपला स्वत:शीच केलेला संवाद. शॅड हेल्मस्टेटर यांच्या म्हणण्यानुसार तर ७७ टक्के संवाद स्वत:शीच होत असतो. जागेपणी आपण स्वत:शी सतत बोलत असतो. आता हे वाचत असतानाही थांबून, क्षणभर डोळे मिटून, विचार केला तर आपल्या सहज लक्षात येते की आपण स्वत:शी आवाज न करता सतत बोलत असतो. कारण विचार करणे म्हणजे स्वत:शी बोलणेच असते. मात्र आपण या संवादला फार कमी लेखतो.
आपण जेव्हा शांत बसत असतो तेव्हादेखीस आतल्या आता संवादाचे चक् हे नेहमी सुरुच असते. त्यामुळे आज सकाळी उठल्यानंतर आपल्या संवादाकडे लक्ष द्या. आपला आतला आवाज काय सांगतो त्याला योग्य प्रकारे प्रतिसाद देण्यास सुरुवात करा. कारण यातूनच मोठ्या प्रमाणात प्रगती होत असते. जे लोक प्रभावी आत्मसंवाद करताता किंवा त्या संवादाचा योग्य प्रमाणात वापर करून घेतात त्यांना यश हे हमखास मिळते. किंबहुना यशस्वी लोकांच्या यशात या आत्मसंवादाचा तसेच विचारप्रक्रियेचा मोठा वाटा असतो.
Listen to your inner voice sometime while constantly expressing
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण हे भौतिकशास्त्र नाही, ते रसायनशास्त्र, युतीच्या मतांची बेरीज-वजाबाकी होत नाही, अमित शहा यांचा दावा
- सामनाच्या संपादकांचे नेते आता सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी, देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांवर निशाणा
- मुख्यमंत्री महिला आमदाराला म्हणाले तुम्ही सुंदर दिसता, आमदारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे केली तक्रार
- कलम ३७० लागू करण्यापूर्वी काश्मीरमध्ये शांतता होती का? अमित शहा यांचा सवाल