Corona Vaccination In India : 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्ण केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. कोरोना लशीची अजिबात कमतरता नाही.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्ण केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. कोरोना लशीची अजिबात कमतरता नाही.
या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, “1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्वांनी त्वरित नोंदणी करून लसीकरण करावे, अशी आमची विनंती आहे.”
It has been decided that from 1st April, the vaccine will open for everybody above 45 years of age. We request that all eligible should immediately register and get vaccinated: Union Minister Prakash Javadekar #COVID19 pic.twitter.com/RWoTORzYnW
— ANI (@ANI) March 23, 2021
सध्या देशात कोरोना महामारीची दुसरी लाट जोरात सुरू आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांतील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकार कोरोनाविरुद्ध बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लसीकरण सर्वात प्रभावी असल्याचे सरकारचे मत आहे.
आतापर्यंत देशात 4.72 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 4,72,07,134 डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- काय आहे IPS Rashmi Shukla यांच्या Top Secret Report मध्ये?, ठाकरे-पवार सरकार का आले अडचणीत? वाचा सविस्तर..
- देवेंद्र फडणवीसांचे आरोप मुख्यमंत्री – गृहमंत्र्यांवर; पण परमवीर सिंगांपाठोपाठ आता इंटेलिजन्सच्या कमिशनर रश्मी शुक्ला राष्ट्रवादीच्या “टार्गेटवर”!!
- चंद्रकांत पाटलांचा घणाघात, सत्य बाहेर येणारच, अन्यायाविरुद्ध राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांसह रस्त्यावर उतरू!
- देवेंद्र फडणवीसांचा धमाका कोणा-कोणाला “घेऊन जाणार”??; ६.३ जीबी डेटामध्ये आहे काय?? कोणा-कोणाची संभाषणे??, मुख्यमंत्र्यांनी कोणा-कोणाच्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घातलेय??
- Gautala Autramghat Sanctuary: वाघोबाचा ४५० किमीचा प्रवास; ८१ वर्षांनंतर औरंगाबादजवळच्या गौताळ्यात ‘देशी टायगर’.. प्राणीप्रेमी खूष
- काय आहे केन-बेटवा नदीजोड प्रकल्प?, शेतकऱ्यांचे भाग्य कसे उजळणार?