जग मंदीच्या उंबरठ्यावर असतानाही भारताची उत्तम कामगिरी, गत वर्षभरात मोदी सरकारसाठी 4 गुड न्यूज


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 2023-24ला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्षात (2022-23) भारत सरकारला अनेक आघाड्यांवर चांगली बातमी मिळाली. दरम्यान, सरकारनेही काही कठोर पावले उचलली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला, त्यामुळे जगभरात महागाईचा दर उच्चांकावर पोहोचला. यानंतर जागतिक मंदीची भीती अधिक गडद होऊ लागली. या कठीण काळातही भारतीय अर्थव्यवस्थेने ताकद दाखवली आणि ब्रिटनला मागे टाकत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था बनली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात मोठे बदल दिसून आले. पाहुयात ग्लोबल इकॉनॉमीत भारताचे अचीव्हमेंट्स…India’s good performance even as the world is on the brink of recession, 4 good news for the Modi government in the last year



जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

आर्थिक आघाडीवर कठीण परिस्थितीतून जात जागतिक अर्थव्यवस्थेने ऐतिहासिक आकडा पार केला. 2022-23 या आर्थिक वर्षात ब्रिटनला मागे टाकून भारताने जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले. मंदी आणि महागाईच्या परिणामांमुळे जगभरातील अर्थव्यवस्था त्रस्त झाल्या असल्या, तरी भारतीय अर्थव्यवस्थेने सर्व अडचणींचा सामना करूनही मोठा टप्पा पार केला आहे. भारताच्या जीडीपीचा आकार 3 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

22 टक्के पेक्षा जास्त GST कलेक्शन

2022-23 या आर्थिक वर्षात एकूण GST संकलन 18.10 लाख कोटी रुपये झाले आहे. 2022-23 मध्ये एकूण महसूल मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22 टक्के अधिक होता. एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. यानंतर मार्च 2023 मध्ये जीएसटी संकलनाने 1.60 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला.

प्रत्यक्ष कर संकलनात वाढ

2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन सरकारच्या अंदाजापेक्षा जास्त होते. 2022-23 या आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी 2021-22 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 14.12 लाख कोटी रुपये होते. त्यानुसार, 2022-23 मध्ये प्रत्यक्ष कर संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 17.63 टक्के अधिक आहे.

सोने पुन्हा उजळले

आर्थिक वर्ष 23 मध्ये सोन्याच्या किमतीत दुहेरी अंकी वाढ नोंदवण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 52000 ते 60000 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच, किमतीत 8000 रुपयांची उसळी आली आणि 15% परतावा सोन्याने दिला. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर महागाईचा दर वाढला. त्यामुळे संपूर्ण जगात मंदीची भीती वाढली आहे. संकटाची परिस्थिती पाहता जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आणि त्याचे भाव गगनाला भिडले. भारतात सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे.

रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर संपूर्ण जगाच्या जागतिक पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला. त्यामुळे संपूर्ण जगात महागाई दराने मोठी झेप घेतली आहे. यावर मात करण्यासाठी जगातील जवळपास सर्वच देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मंदीची भीती अधिक गडद होऊ लागली. भारतातही रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे.

India’s good performance even as the world is on the brink of recession, 4 good news for the Modi government in the last year

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात