प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे.Nawab malik targets devendra fadanavis over rashmi shukla report
सरकार अस्थिर करण्याच्या कारस्थानाची भाजपच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. या आरोपाला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मलिक म्हणाले, की पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले आहे हे रश्मी शुक्लांच्या रिपोर्टच्या आधारावर फडणवीस आरोप करत राहिले. एक पान फक्त प्रेसला द्यायचे आणि पूर्ण रिपोर्ट द्यायचा नाही, असे त्यांनी केले आहे.
त्या रिपोर्टमध्ये नावे आहेत त्यानुसार बदल्या झाल्या नाहीत. फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. बदलीची प्रोसिजर आहे. त्याच्यात बोर्ड आहे. एसीएसहोमच्या अध्यक्षतेखाली ते बोर्ड असते. ते शिफारसी करते.
कनिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांचा बोर्ड हा डीजीच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का? असा गंभीर सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचे काम फडणवीस करत होते. कालच फडणवीस यांचे असत्य काय आणि सत्य काय हे मी जनतेसमोर ठेवले आहे. भाजपाला सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून ते हे सगळे उपद्रव करत आहेत, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.
Nawab malik targets devendra fadanavis over rashmi shukla report